मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात शेतातील वादातून महिलेस मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील हिलाळ वस्ती येथे शेतातील वादातून महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी धुरपाबाई देवराम शिंदे (वय ६०, रा. हिलाळ वस्ती, कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. धुरपाबाई शिंदे या आपल्या जाऊ सुशिला दत्तात्रय शिंदे व शोभा विनायक शिंदे यांच्यासह शेतात काम करुन घरी जात असताना वाद निर्माण झाला.

दरम्यान, फिर्यादींच्या शेत गट नं. १६३१/१ मध्ये आरोपी हरीदास मुलमुले यांनी आपली गुरे बांधली होती. याबाबत फिर्यादींनी हरकत घेतल्यावर त्याचा मुलगा सुरज हरीदास मुलमुले याने उर्मटपणे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सुरज, संगीता, बाळु, संग्राम व पमा मुलमुले या पाच जणांनी धावत येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. आरोपी संगीता हिने फिर्यादींचे केस पकडून गळा दाबला व जमिनीवर पाडले, तसेच सर्वांनी मिळून हातांनी मारहाण केली व धमकावले.

या घटनेनंतर शिंदे यांनी शिरुर पोलिसांत तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अरुण उबाळे हे करीत आहे.ग्रामस्थांत या घटनेने एकच खळबळ उडाली असून, शेतातील वाद आता मारहाणीपर्यंत पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे.

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

5 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

12 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

12 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

12 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

12 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

12 तास ago