मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात उडी मारताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडून तरुण बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील माळीवस्ती परिसरातील ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (दि.२४) सकाळी १० वाजता घडली. ओढ्यातील खडकावरून दुसऱ्या बाजूला उडी मारत असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला अशी माहिती त्याच्या साथीदाराने दिल्याने स्थानिक ग्रामस्थांसह, पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेडच्या पथंकाने दिवसभर शोधमोहीम राबविली.

 

मुळचा जळगाव जिल्ह्यातील राजेंद्र विक्रम कोळी हा २५ वर्षीय तरुण विजेचे खांब उभे करण्याचे काम करतो. आज दिवसभर कवठे येमाई परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे काम बंद होते, त्याच्या एका साथीदारासह दोघे ओढ्याकडे आले होते. राजेंद्र उडी मारत असताना घसरुन पडल्याचे त्याच्या साथीदाराने सांगितले. जिथे तो पडला त्या ठिकाणी खडक असून तेथे खडकामध्ये रांजनाच्या आकाराचा मोठा खड्डा आहे. त्यामुळे तो खड्ड्यात अडकला की प्रवाहात वाहून गेला याचा अंदाज येत नसल्याने शोधकार्यात अडचणी आल्या.

 

या घटनेची माहिती समजताच पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे, कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव, रावडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब किठे, गुलाब वागदरे, किसन हिलाळ, बाबू खाडे, टाकळी हाजी चे पोलीस मित्र विक्रम घोडे,संतोष घोडे आदी ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. निवासी नायब तहसिलदार स्नेहलता गिरीगोसावी यांनी घटनास्थळी भेट देत मंडल अधिकारी माधुरी बागले, कवठेच्या तलाठी ललिता वाघमारे, लहू सांडभोर, कोतवाल प्रशांत शिंदे यांना घटनास्थळी थांबून लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या.

 

टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलीस नाईक उमेश भगत, विष्णू दहिफळे, दिपक पवार, होमगार्ड हरीशचंद्र दंडवते, सनी शिंदे यांनी दिवसभर शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध कार्यास अडचणी आल्याने पुणे प्राधिकरणच्या फायर ब्रिगेडचे विशेष पथकास पाचारण करण्यात आले. उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते,मात्र अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

2 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

2 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

2 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

2 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

4 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

4 तास ago