आरोग्य

नेहमीच्या खाण्यातील ५ पदार्थामुळे होतो जीवघेणा कॅन्सर

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्यामते आपल्या आहारातील काही ठराविक पदार्थ थेट कॅन्सरच्या धोक्याशी जोडलेले आहेत. जे हळहळू शरीरात टॉक्सिन्स वाढवून कॅन्सरचा धोका निर्माण करतात. रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात समजून घेऊ.

१) रिफाईंन शुगर आणि गोड पेय

साखर ही अधुनिक काळातील स्लो पॉयझन मानले जाते. साखरेच्या अतिसेवनानं शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊ शकते. साखरेमुळे येणारा लठ्ठपणा हा कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. साखरयुक्त पेयांच्या अतिसेवनानं पॅनक्रियाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

२) रिफाइंड कार्बोहायड्रेट्स

मैदा तयार करताना त्यातील सर्व फायबर्स काढून टाकले जातात आणि तो पांढरा करण्यासाठी ऑलॉक्सॉन सारख्या रसायनांचा वापर केला जातो. मैद्याच्या अतिसेवनानं रक्तातील साखर अचानक वाढते. ज्यामुळे शरीरात दीर्घकालीन सूज तयार होते.

३) ट्रास फॅट्स

बाहेरचे तळलेले पदार्थ एकाच तेलात वारंवार तळले जातात. तेल वारंवार उकळल्यामुळे त्यात एक्रिलामाईड नावाचे घातक रसायन तयार होते. फूड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार उच्च तापमानाला गरम केलेल्या पिष्टमय पदार्थांमध्ये एक्रिलामाईड तयार होते जे कार्सिनोजेनिक मानले जाते.

४) अल्ट्रा प्रोसेस्ड फूड

चिप्स, इन्संट नुडल्स, बिस्किटं आणि पॅक केलेले ज्यूस यामध्ये चव वाढवण्यासाठी कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हज वापरले जातात, एका अभ्यासानुसार पॅकेटमधील अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या १० टक्के वाढीमुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या वाढतो.

५) अति गरम पेय

अनेकांना वाफावळलेला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण अति गरम पेय आपल्या अन्ननलिकेतील नाजूक आवरणाला इजा पोहोचवतात. इंटरनॅ्रशनल एजन्सी ऑन कॅन्सरनं ६५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम पेयांना प्रोबॅबल कार्सिनोजन म्हणून घोषित केलं आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

11 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

13 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

13 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

16 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

17 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

20 तास ago