सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्यामते आपल्या आहारातील काही ठराविक पदार्थ थेट कॅन्सरच्या धोक्याशी जोडलेले आहेत. जे हळहळू शरीरात टॉक्सिन्स वाढवून कॅन्सरचा धोका निर्माण करतात. रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात समजून घेऊ.
१) रिफाईंन शुगर आणि गोड पेय
साखर ही अधुनिक काळातील स्लो पॉयझन मानले जाते. साखरेच्या अतिसेवनानं शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊ शकते. साखरेमुळे येणारा लठ्ठपणा हा कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. साखरयुक्त पेयांच्या अतिसेवनानं पॅनक्रियाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
२) रिफाइंड कार्बोहायड्रेट्स
मैदा तयार करताना त्यातील सर्व फायबर्स काढून टाकले जातात आणि तो पांढरा करण्यासाठी ऑलॉक्सॉन सारख्या रसायनांचा वापर केला जातो. मैद्याच्या अतिसेवनानं रक्तातील साखर अचानक वाढते. ज्यामुळे शरीरात दीर्घकालीन सूज तयार होते.
३) ट्रास फॅट्स
बाहेरचे तळलेले पदार्थ एकाच तेलात वारंवार तळले जातात. तेल वारंवार उकळल्यामुळे त्यात एक्रिलामाईड नावाचे घातक रसायन तयार होते. फूड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार उच्च तापमानाला गरम केलेल्या पिष्टमय पदार्थांमध्ये एक्रिलामाईड तयार होते जे कार्सिनोजेनिक मानले जाते.
४) अल्ट्रा प्रोसेस्ड फूड
चिप्स, इन्संट नुडल्स, बिस्किटं आणि पॅक केलेले ज्यूस यामध्ये चव वाढवण्यासाठी कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हज वापरले जातात, एका अभ्यासानुसार पॅकेटमधील अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या १० टक्के वाढीमुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या वाढतो.
५) अति गरम पेय
अनेकांना वाफावळलेला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण अति गरम पेय आपल्या अन्ननलिकेतील नाजूक आवरणाला इजा पोहोचवतात. इंटरनॅ्रशनल एजन्सी ऑन कॅन्सरनं ६५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम पेयांना प्रोबॅबल कार्सिनोजन म्हणून घोषित केलं आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…