आरोग्य

ऐन चाळिशीत कँसर होण्याची ५ प्रमुख कारण

सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये अनेक आजार लहान वयातच डोके वर काढतात आणि त्यात कँसरसारखा गंभीर आजारही आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. विशेषतः वयाच्या चाळिशीत कँसर होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, ही बाब चिंतेची आहे. बदललेली लाईफस्टाईल चुकीच्या सवयी, वाढता स्ट्रेस, आहारातील पोषणाची कमतरता आणि पर्यावरणीय घटक यांचा आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. अनेकदा सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित केल्यामुळे कँसर उशिरा निदान होतो. त्यामुळे वेळेत सावधगिरी बाळगण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी चाळिशीत कँसर होण्यामागील प्रमुख कारणे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
पूर्वी कॅन्सर हा वयाची साठी ओलांडलेल्या लोकांमध्ये आढळणारा आजार मानला जायचा. मात्र, बदलत्या काळानुसार हे चित्र भयावह रित्या बदललं आहे. आज आपली चाळिशी गाठलेली तरुण पिढी या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अधिक अडकताना दिसत आहे. कॅन्सर होण्यामागे केवळ तंबाखू किंवा सिगारेटच जबाबदार नसून, इतर ५ धक्कादायक कारणं आहेत जी आपण रोजच्या आयुष्यात नजरेआड करतो. विशेषतः ४० ते ४५ या वयोगटात हा आजार अधिक बळावत आहे. अनुवांशिकतेपासून ते रोजच्या खाण्यापिण्यापर्यंत अशा ५ महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या शरीरात कॅन्सरच्या पेशींना आमंत्रण देतात त्या नेमक्या कोणत्या ते पाहूयात.
वयाच्या चाळिशीत कॅन्सर होण्याची मुख्य ५ कारण
१) बदलती लाईफस्टाईल: तासनतास एकाच जागी बसून काम करणे, जंक फूड आणि फास्ट फूड जास्त प्रमाणांत खाणे, आहारात साखरेचे वाढलेले प्रमाण आणि अपुरी झोप यामुळे शरीराची नैसर्गिक कार्यक्षमता कमी होते. मद्यपान आणि सततचा मानसिक ताण शरीराची प्रतिकारशक्ती आतून पोखरत आहे. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड, मैद्याचे पदार्थ आणि फायबरची कमतरता असलेला आहार पचनसंस्थेवर ताण आणतो. गरजेपेक्षा जास्त अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरियांचे’ नुकसान होते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि पर्यायाने कॅन्सरचा धोका वाढतो.
२) वायू प्रदूषण: हवेतील PM2.5 सारखे सूक्ष्म आणि अतिशय धोकादायक प्रदूषक कण श्वासावाटे थेट फुफ्फुसांत शिरतात. हे कण शरीरात ‘सूज’ निर्माण करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. हे विषारी कण शरीरातील पेशींच्या DNA ला हानी पोहोचवतात. जेव्हा DNA मध्ये बिघाड होतो, तेव्हा पेशींची वाढ अनियंत्रित होते आणि त्यातून कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते. वाहनांचा धूर, खराब हवा आणि घरांमध्ये खेळत्या हवेचा अभाव यामुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे.
3) अनुवांशिकतेपेक्षा लाईफस्टाईल अधिक जबाबदार: काही लोकांमध्ये कॅन्सरचा धोका हा BRCA जीन म्यूटेशन किंवा कुटुंबातील कॅन्सरच्या इतिहासामुळे असतो. मात्र, अशा प्रकरणांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. चुकीच्या सवयींमुळे ज्या कॅन्सर पेशी वयाच्या साठ किंवा सत्तरीनंतर सक्रिय व्हायला हव्या होत्या, त्या आता चाळिशीच्या आतच शरीरावर वाईट परिणाम करू लागल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर, चुकीची लाईफस्टाईल कॅन्सरच्या प्रक्रियेला वेग देते.
4) आजाराची उशिरा होणारी ओळख: बहुतांश तरुणांना असे वाटते की, कॅन्सर हा केवळ वृद्धांना होणारा आजार आहे. “आपल्याला इतक्या लवकर असा आजार होऊच शकत नाही,” या मानसिकतेमुळे ते शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करतात. शरीरात होणाऱ्या छोट्या गाठी, अपचन, सततचा थकवा किंवा वजनातील घट यांसारख्या सुरुवातीच्या लक्षणांना तरुण पिढी कॉमन समस्या समजून घरगुती उपाय किंवा पेनकिलर्स घेऊन टाळतात. याच चुकीच्या विचारसरणीमुळे जेव्हा तरुण रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचतात, तेव्हा अनेकदा कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. वेळेवर निदान न होणे हेच मृत्यूदराचे मुख्य कारण ठरत आहे.
५) लक्षणांकडे दुर्लक्ष करणे: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे. शरीराच्या कोणत्याही भागात सतत वेदना होत असतील आणि औषधांनीही आराम मिळत नसेल, तर ते चिंतेचे कारण असू शकते. कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता जर अचानक वजन वेगाने कमी झाले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

9 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

9 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

9 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

10 तास ago

शरीरात हे ५ संकेत दिसणं म्हणजे नक्कीच काहीतरी तंत्र बिघडलंय, दुर्लक्ष कराल तर होईल मोठं नुकसान

तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि…

10 तास ago

कॉलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातले हे पदार्थ; चांगल्या तब्येतीसाठी आजपासूनच खाणं सोडा

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच…

10 तास ago