आरोग्य

शुगर वाढण्याची भीती विसरा, रोज फक्त १ कप ‘ब्लॅक कॉफी’ प्या…

डायबिटीस असणाऱ्यांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे हे फार कठीण काम असते. खाण्यापिण्यातील थोडासा निष्काळजीपणाही आरोग्यावर गंभीर आणि वाईट परिणाम करू शकतो. डायबिटीस हा लाईफस्टाईलशी निगडित असा आजार आहे, जो योग्य आहार आणि काही खास सवयींचे पालन करुन सहज नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि आपल्या लाईफस्टाईलला विशेष महत्त्व असते.

डायबिटीस असेल तर काय खावे आणि काय टाळावे याबाबत अनेक शंका असतात, त्यातच कॉफी पिणे डायबिटीसच्या रुग्णांसाठी योग्य आहे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो. साखर आणि क्रीम न घातलेली ब्लॅक कॉफी मात्र योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी ब्लॅक कॉफी कधी, किती आणि कशी प्यावी, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे ठरते.

ब्लॅक कॉफी आणि मधुमेह यांचा संबंध

1) ब्लॅक कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात पॉलीफेनॉल आणि इतर अँटी ऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारतात. जेव्हा शरीर इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते.

2) जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याची भीती असते. ब्लॅक कॉफी रक्तातील साखरेचा हा वाढता वेग कमी करण्यास मदत करते. महत्त्वाचे म्हणजे, यात कॅलरीजचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक सुरक्षित आणि उत्तम पेय मानले जाते.

3) काही महत्त्वपूर्ण जागतिक संशोधनांनुसार, जे लोक दररोज मर्यादित प्रमाणात (सुमारे २-३ कप) ब्लॅक कॉफी पितात, त्यांच्यामध्ये टाइप २ मधुमेह होण्याचा धोका साधारणपणे २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

डायबिटीस असेल तर ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

1) ब्लॅक कॉफी मेटाबॉलिज्मचा वेग वाढवते. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते. वजन नियंत्रणात राहिल्यामुळे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करणे मधुमेहींसाठी सोपे जाते.

2) ब्लॅक कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. हे अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील ‘फ्री रेडिकल्स’ कमी करतात आणि पेशींना होणारे नुकसान टाळतात. यामुळे शरीरातील अंतर्गत सूज कमी होऊन पेशी सुरक्षित राहतात.

3) मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा हृदयविकाराचा धोका असतो. ब्लॅक कॉफी रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाशी संबंधित हृदय रोगांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

डायबिटीस असेल तर ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत

मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसभरात केवळ १ ते २ कप ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. मर्यादित प्रमाणात घेतलेली कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर ब्लॅक कॉफी जास्त प्रमाणांत घेतली तर त्यातील कॅफीनमुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. वाढलेला रक्तदाब मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो, कारण यामुळे किडनी आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.

कॉफीचा खरा फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा ती साखर, दूध किंवा क्रीमशिवाय घेतली जाते. यामुळे रक्तातील साखरेवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते. जर तुम्हाला ब्लॅक कॉफी खूप कडवट वाटत असेल, तर त्यात साखर घालण्याऐवजी चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. दालचिनी केवळ चवच वाढवत नाही, तर ती रक्तातील साखर नियंत्रित करण्यासही मदत करते. याशिवाय, तुम्ही चवीसाठी लिंबाचा रस देखील वापरू शकता. ब्लॅक कॉफी आम्लयुक्त असते. त्यामुळे ती पूर्णपणे रिकाम्या पोटी पिण्यापेक्षा त्यासोबत एखादा हलका स्नॅक किंवा जेवणानंतर काही वेळाने घेतल्यास पोटाला त्रास होत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

60 मिनिटे ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago