आरोग्य

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक, भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही…

हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आजारांने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते ते उच्च रक्तदाब. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुकीची जीवनशैली, जास्त प्रमाणात मीठ खाणे, ताण आणि सतत एकाच जागी बसून काम करणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असे देखील म्हटले जाते.

उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून मीठ कमी करावे लागेलच असे नाही. या ५ वाईट सवयींमुळे देखील आपल्याला हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

उच्च रक्तदाब म्हणजे काय…

उच्च रक्तदाब ही धोक्याची स्थिती आहे. जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयाला अधिक प्रमाणात काम करावे लागते. या क्रियेला अति उच्चरक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता अधिक असते.

1) प्रक्रिया केलेले पदार्थ: बाजारात पॅक केलेले अन्नपदार्थ अतिप्रमाणात विकले जातात. यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यामध्ये चरबी वाढवणारे घटक आणि रसायने असतात.

2) दारु: दारु प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होते. जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मद्यपानाचे करणे टाळावे. यामुळे उच्च रक्तदाब वाढू शकतो. दारु प्यायल्यानं रक्तवाहिन्या रुंद होतात. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त काम करावं लागते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

3) लठ्ठपणा: जास्त खाणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आपल्याला लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. यामुळे वजन वाढणे, अति लठ्ठपणा येऊन हृदयावर दबाव येतो. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची परिस्थिती निर्माण होते. तसेच यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर देखील परिणाम होतो. लठ्ठपणा वाढल्यास आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य धोक्यात येते. त्यासाठी आपला आहार संतुलित ठेवायला हवा.

4) अतिरिक्त ताण: कामाचा किंवा सतत एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने आपल्याला ताण येतो. ज्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. ताण आल्यानंतर शरीर ॲड्रेनालाईन हार्मोन सोडते, ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. ज्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो.

5) धुम्रपान: धुम्रपानामुळे उच्च रक्तबाची समस्या अधिक वाढते. वारंवार धुम्रपान करणाऱ्या लोकांना हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जावं लागतं. तसेच उच्च रक्तदाब वाढून स्ट्रोकचा धोका देखील वाढतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

29 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago