आरोग्य

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक, भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही…

हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आजारांने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते ते उच्च रक्तदाब. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुकीची जीवनशैली, जास्त प्रमाणात मीठ खाणे, ताण आणि सतत एकाच जागी बसून काम करणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असे देखील म्हटले जाते.

उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून मीठ कमी करावे लागेलच असे नाही. या ५ वाईट सवयींमुळे देखील आपल्याला हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

उच्च रक्तदाब म्हणजे काय…

उच्च रक्तदाब ही धोक्याची स्थिती आहे. जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयाला अधिक प्रमाणात काम करावे लागते. या क्रियेला अति उच्चरक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता अधिक असते.

1) प्रक्रिया केलेले पदार्थ: बाजारात पॅक केलेले अन्नपदार्थ अतिप्रमाणात विकले जातात. यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यामध्ये चरबी वाढवणारे घटक आणि रसायने असतात.

2) दारु: दारु प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होते. जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मद्यपानाचे करणे टाळावे. यामुळे उच्च रक्तदाब वाढू शकतो. दारु प्यायल्यानं रक्तवाहिन्या रुंद होतात. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त काम करावं लागते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

3) लठ्ठपणा: जास्त खाणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आपल्याला लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. यामुळे वजन वाढणे, अति लठ्ठपणा येऊन हृदयावर दबाव येतो. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची परिस्थिती निर्माण होते. तसेच यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर देखील परिणाम होतो. लठ्ठपणा वाढल्यास आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य धोक्यात येते. त्यासाठी आपला आहार संतुलित ठेवायला हवा.

4) अतिरिक्त ताण: कामाचा किंवा सतत एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने आपल्याला ताण येतो. ज्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. ताण आल्यानंतर शरीर ॲड्रेनालाईन हार्मोन सोडते, ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. ज्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो.

5) धुम्रपान: धुम्रपानामुळे उच्च रक्तबाची समस्या अधिक वाढते. वारंवार धुम्रपान करणाऱ्या लोकांना हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जावं लागतं. तसेच उच्च रक्तदाब वाढून स्ट्रोकचा धोका देखील वाढतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

8 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

10 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

10 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

10 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

10 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

10 तास ago