मुख्य बातम्या

जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वारस नोंदणीसाठी विशेष मोहीम

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

शिरूर (अरूणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि मा. जिल्हाधिकारी, पुणे व मा. उपविभागीय अधिकारी, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात “जिवंत सातबारा मोहीम” राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मयत झालेल्या खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

(दि. १ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत चावडी वाचनाद्वारे न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार, ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२५ दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) स्थानिक चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह वारस ठरवणार असून, २१ एप्रिल ते १० मे २०२५ दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे फेरफार तयार करून मंडळ अधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत. परिणामी, सर्व जिवंत वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येणार आहे.

शिरूर तालुक्यातील १० मंडळांमध्ये एकूण ८०६ मयत खातेदारांची यादी तयार झाली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

शिरूर-३५, रांजणगाव-६१, तळेगाव ढमढेरे-८५, कोरेगाव भिमा-५४, पाबळ-९३, टाकळी हाजी-९७, मलठण-११८, वडगाव रासाई-५४, न्हावरा-११६, निमोणे-९३. या विशेष मोहिमेअंतर्गत जे खातेदार गावात राहत नाहीत, त्यांच्यासाठी “पब्लिक डेटा एंट्री (PDE)” प्रणालीद्वारे मोबाईलवरूनही वारस नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर, शिरूर तालुक्याचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या गावातील मयत खातेदारांची माहिती संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करून या ऐतिहासिक मोहिमेसाठी सहकार्य करावे.

“जिवंत सातबारा” ही केवळ एक प्रक्रिया नसून गावाच्या मालमत्ता व्यवस्थापनात पारदर्शकता आणि वारस हक्कांच्या अचूक नोंदीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे.”

बाळासाहेब म्हस्के – तहसिलदार शिरूर.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

19 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

19 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

19 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

21 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago