आरोग्य

९०% लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात

बाजारात टरबूज दिसू लागले की उन्हाळ्याची जाणीव व्हायला लागते. उन्हाळ्याच्या ४ महिन्यांतच मिळणारं हे फळ अनेकांच्या आवडीचं.

उन्हाळ्याचा त्रास सुसह्य करण्यासाठी टरबूज खाणं अत्यंत फायदेशीरही मानलं जातं. पण ते खात असताना तुम्ही काही चुका तर करत नाही ना हे एकदा तपासून पाहा कारण तज्ञांच्या मध्ये ९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात आणि त्यामुळे मग वेगवेगळे आजार होतात.

याविषयीची पोस्ट आहारतज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की कधीही उपाशीपोटी टरबूज खाऊ नका. कारण त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं. यामुळे मग गॅसेस होणे, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

जेवण झाल्यानंतर किंवा अगदी भरपेट नाश्ता केल्यानंतर लगेचच टरबूज खाणं टाळावं. कारण त्यामुळे पोट फुगल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळेच जेवण झाल्यानंतर कमीत कमी एखाद्या तासाने टरबूज खायला हवं.

फ्रिजमधून बाहेर काढलेलं टरबूज लगेच खाऊ नका. यामुळे सर्दी, शिंका येणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे टरबुजाला आधी थोडं सामान्य तापमानावर येऊ द्या आणि त्यानंतरच ते खा.

टरबुजावर मीठ टाकून खाण्याची सवय अनेकांना असते. पण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण यामुळे शरीरातले सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोकाही असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

2 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

4 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

4 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

6 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

7 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

7 तास ago