आरोग्य

उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खाण्याचे शरीराला होणारे फायदे

कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी कांद्याचाच अधिक वापर केला जातो. कांदा टेस्टी तर असतोच, सोबतच यात अनेक पोषक तत्वही असतात. बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. कच्चा कांदा खाणं उन्हाळ्यात अधिक फायदेशीर मानलं जातं. इतकंच नाही तर बरेच लोक उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खिशातही एक कांदा ठेवतात. आता उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं काय होत.
कांद्यामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट्स यांसारखे पोषक तत्व असतात. अशात जर तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला अनेक पोषक तत्व यातून मिळू शकतात.
उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाणं फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. सोबतच यात सोडिअम आणि पोटॅशिअम असतं जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.
खाज आणि घामोळ्यांपासून बचाव
कांद्यामधील क्वेरसेटिन आणि सल्फरमुळे शरीर थंड राहतं. क्वेरसेटिन एक असं तत्व आहे जे हिस्टमाइन नावाचं रसायनही कमी करतं जे उष्णतेमुळे एलर्जी, रॅशेज आणि कीटक चावल्याने होणारी खाज दूर करतं.
ब्लड प्रेशर कंट्रोल
उन्हाळ्यात शरीराला आपलं तापमान सामान्य ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हृदय, फुप्फुसं आणि किडनीवर जास्त दबाव पडतो. कांद्यातील एलील सल्फाइड्स रक्तवाहिन्या लवचिक आणि पसरट ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि रक्त पुरवठाही सुरळीत राहतो.
कांद्याचा रसही फायदेशीर
उन्हाळ्यात शरीरात जर उष्णता वाढली असेल तर अशावेळी उष्णता कमी करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस रात्री झोपताना तळपायांना लावून ठेवा. यामुळे उष्णता दूर होईल. तसेच कांद्याचा रस तुम्ही कपाळावरही लावू शकता. यानंही उष्णता बाहेर निघते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

5 तास ago

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

15 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

15 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago