आरोग्य

उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खाण्याचे शरीराला होणारे फायदे

कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी कांद्याचाच अधिक वापर केला जातो. कांदा टेस्टी तर असतोच, सोबतच यात अनेक पोषक तत्वही असतात. बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. कच्चा कांदा खाणं उन्हाळ्यात अधिक फायदेशीर मानलं जातं. इतकंच नाही तर बरेच लोक उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खिशातही एक कांदा ठेवतात. आता उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं काय होत.
कांद्यामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट्स यांसारखे पोषक तत्व असतात. अशात जर तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला अनेक पोषक तत्व यातून मिळू शकतात.
उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाणं फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. सोबतच यात सोडिअम आणि पोटॅशिअम असतं जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.
खाज आणि घामोळ्यांपासून बचाव
कांद्यामधील क्वेरसेटिन आणि सल्फरमुळे शरीर थंड राहतं. क्वेरसेटिन एक असं तत्व आहे जे हिस्टमाइन नावाचं रसायनही कमी करतं जे उष्णतेमुळे एलर्जी, रॅशेज आणि कीटक चावल्याने होणारी खाज दूर करतं.
ब्लड प्रेशर कंट्रोल
उन्हाळ्यात शरीराला आपलं तापमान सामान्य ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हृदय, फुप्फुसं आणि किडनीवर जास्त दबाव पडतो. कांद्यातील एलील सल्फाइड्स रक्तवाहिन्या लवचिक आणि पसरट ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि रक्त पुरवठाही सुरळीत राहतो.
कांद्याचा रसही फायदेशीर
उन्हाळ्यात शरीरात जर उष्णता वाढली असेल तर अशावेळी उष्णता कमी करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस रात्री झोपताना तळपायांना लावून ठेवा. यामुळे उष्णता दूर होईल. तसेच कांद्याचा रस तुम्ही कपाळावरही लावू शकता. यानंही उष्णता बाहेर निघते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

7 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

7 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

7 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

7 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

7 तास ago