आरोग्य

उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खाण्याचे शरीराला होणारे फायदे

कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी कांद्याचाच अधिक वापर केला जातो. कांदा टेस्टी तर असतोच, सोबतच यात अनेक पोषक तत्वही असतात. बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. कच्चा कांदा खाणं उन्हाळ्यात अधिक फायदेशीर मानलं जातं. इतकंच नाही तर बरेच लोक उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खिशातही एक कांदा ठेवतात. आता उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं काय होत.
कांद्यामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट्स यांसारखे पोषक तत्व असतात. अशात जर तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला अनेक पोषक तत्व यातून मिळू शकतात.
उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाणं फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. सोबतच यात सोडिअम आणि पोटॅशिअम असतं जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.
खाज आणि घामोळ्यांपासून बचाव
कांद्यामधील क्वेरसेटिन आणि सल्फरमुळे शरीर थंड राहतं. क्वेरसेटिन एक असं तत्व आहे जे हिस्टमाइन नावाचं रसायनही कमी करतं जे उष्णतेमुळे एलर्जी, रॅशेज आणि कीटक चावल्याने होणारी खाज दूर करतं.
ब्लड प्रेशर कंट्रोल
उन्हाळ्यात शरीराला आपलं तापमान सामान्य ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हृदय, फुप्फुसं आणि किडनीवर जास्त दबाव पडतो. कांद्यातील एलील सल्फाइड्स रक्तवाहिन्या लवचिक आणि पसरट ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि रक्त पुरवठाही सुरळीत राहतो.
कांद्याचा रसही फायदेशीर
उन्हाळ्यात शरीरात जर उष्णता वाढली असेल तर अशावेळी उष्णता कमी करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस रात्री झोपताना तळपायांना लावून ठेवा. यामुळे उष्णता दूर होईल. तसेच कांद्याचा रस तुम्ही कपाळावरही लावू शकता. यानंही उष्णता बाहेर निघते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

14 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago