CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 55?
पावसाळ्याचे दिवस म्हटले की घरोघर सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास असणाऱ्या व्यक्ती दिसतात. लहान मुलांना तर हे इन्फेक्शन खूप लवकर होत. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी पाणी साचून राहाते. त्यामुळे डास होण्याचे प्रमाणही खूप वाढते. अगदी कडाकड डास चावतात. त्यातूनच मग मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे आजारही होतात. म्हणूनच आता डास आणि सर्दी- पडसं असा त्रास हे दोन्हीही तुमच्या घरातून पळवून लावयचे असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा.
डास पळवून लावण्यासाठी हल्ली प्रत्येकाच्याच घरामध्ये एक मशिन असते. त्यातील केमिकलमुळे डास घरात येत नाहीत. मशिनचे रिफिल पॅक संपले की आपण ते फेकून देतो. पण तसे करू नका. त्याचाच खास पद्धतीने कसा वापर करायचा पाहा हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा व्हिक्स किंवा झेंडूबाम घ्या. यानंतर त्यामध्ये कापूराच्या २ ते ३ गोळ्या बारीक चुरा करून टाका.
आता या मिश्रणामध्ये अर्धे लिंबू पिळा आणि त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घाला. हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. यानंतर हे मिश्रण एका डास पळवून लावण्याच्या मशिनच्या रिफिल पॅकमध्ये भरा. आता हा रिफिल पॅक मशिनला लावा आणि मशिन सुरू करा. व्हिक्स, कापूर आणि लिंबू यामुळे डास पळून जातील. खोली बंद केलेली असेल तर फक्त १५ ते २० मिनिट हे मशिन चालू ठेवा आणि नंतर बंद करून टाका.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…