आरोग्य

दुपारची झोप आराम नाही, अनेक आजारांना देते निमंत्रणच

सकाळपासून घरातील किंवा बाहेरची वेगवेगळी काम केल्यानंतर दुपारी काही मिनिटांची एक डुलकी घेणं अनेकांची रोजची आवडती बाब असते. खासकरून घरी राहणाऱ्या महिलांना दुपारी थोडा वेळ झोपल्यानं आराम मिळतो. फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्यास यानं मदत मिळते. पण हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दुपारी झोप घेण्याची सवय आरोग्यासंबंधी अनेक समस्यांशी जुळलेली असू शकते.

दिवसा झोप घेण्याच्या सवय असणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारख्या समस्या अधिक आढळून आल्या आहेत. त्याशिवाय दुपारच्या झोपेमुळे रात्री लवकर झोप येत नाही, झोपेचं चक्र बिघडतं आणि मानसिक तणावही वाढतो.

अभ्यासकांचं याबाबत असं मत आहे की, प्रत्येक व्यक्तीनं आपली झोपेची गरज रात्री पूर्ण केली पाहिजे. दुपारी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपल्यानं शरीराची एनर्जी आणि मेंदूची सक्रियता यात गडबड होते. त्यामुळे दुपारची झोप हलक्यात न घेता यामुळे होणारे धोके समजून घेण्याची गरज आहे.

दुपारची झोप आणि हृदय

हार्वर्डच्या रिसर्चमध्ये स्पष्ट आढळून आलं की, जे लोक रोज दुपारी झोप घेतात, त्यांच्यात हृदयासंबंधी आजारांचा धोका अधिक असतो. झोपेनंतर ब्लड प्रेशर अचानक वाढतं आणि हृदयाचे ठोकेही अनियमित आढळून आले. खासकरून जर तुम्ही ३० मिनिटांपेक्षा अधिक झोपत असाल तर नुकसान अधिक होतं.

दुपारची झोप आणि मेटाबॉलिज्म

झोप घेतल्यानंतर तुमचं मेटाबॉलिज्म म्हणजे शरीराची ऊर्जा घालवण्याच्या प्रक्रियेवर वाईट प्रभाव पडतो. रिसर्चमध्ये असं आढळलं की, दुपारी नियमितपणे झोप घेणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा, ब्लड शुगर अनियंत्रित होणे आणि इन्सुलिन रेसिस्टेंस यासारख्या समस्या जास्त होतात. शरीर जेव्हा गरजेशिवाय आराम करतं, तेव्हा कॅलरी बर्न होण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे चरबी वाढू लागते.

दुपारची झोप आणि मानसिक आरोग्य

रोज दुपारी झोप घेण्याच्या सवयीमुळे मानसिक आरोग्य सुद्धा प्रभावित होतं. हार्वर्ड रिसर्चमध्ये दिसून आलं की, जे लोक दिवसा अधिक झोपतात, त्यांच्यात एंग्झायटी, डिप्रेशन आणि थकवा जास्त राहतो. याचं कारण झोप घेतल्यानं तुमचं अलर्टनेस कमी होतो, ज्यामुळे मेंदू सुस्त होतो आणि मूड स्विंग्स वाढू लागतो.

किती वेळ डुलकी घेणं सुरक्षित

जर तुम्हाला दुपारी झोपायचंच असेल तर १० ते २० मिनिटांची ‘पॉवर नॅप’ म्हणजे डुलकी घेण्याची सल्ला एक्सपर्ट देतात. यानं मेंदूला जरा आराम मिळतो, पण गाढ झोप घेण्याचं टाळलं पाहिजे. ३० मिनिटांपेक्षा अधिक झोपत असाल तर झोपेचं चक्र बिघडतं आणि थकवा तसाच राहतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण…

8 तास ago

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या…

9 तास ago

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न…

9 तास ago

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे…

9 तास ago

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी…

9 तास ago

उत्तम आरोग्य म्हणजे काय

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक,…

9 तास ago