आरोग्य

भृंगराज ५ पद्धतीने लावा, केसगळतीची समस्या कायमची थांबून केस होतील काळेभोर

सध्या केसगळतीच्या समस्येपासून अनेक जण त्रस्त आहेत. याचे सर्वात मोठे कारण पुरेसा आहार न घेणे आणि प्रदूषित वातावरणाचा आपल्या केसांवर परिणाम होतो.

केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो. ज्याचा आपल्याला केसांवर परिणाम होतो आणि केस वाढण्याऐवजी केसगळती सुरु होते.

आयुर्वेदानुसार केसगळती रोखण्यासाठी भृंगराज हे वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म असतात. जे शरीराला हानिकारक घटकांपासून संरक्षण देतात. ज्याचा उपयोग केसगळती रोखण्यासाठी होतो.

केसगळती रोखण्यासाठी भृंगराज पावडरमध्ये दही, आवळा पावडर आणि कोरफडीचा गर घालून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. दीड तासानंतर केस हर्बल शॅम्पूने केस धुवा.

भृंगराज पावडर नारळाच्या तेलात मिसळा. रात्री किंवा शॅम्पू करण्यापूर्वी दोन तास आधी टाळू आणि केसांना लावा. हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने चांगला परिणाम मिळतो.

भृंगराजची पाने पाण्यात उकळून केस धुवू शकता. हे पाणी स्प्रे बाटलीत साठवून ठेवा. केस धुण्यापूर्वी दोन तास आधी कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. याचा चांगला परिणाम मिळेल.

भृंगराज तेल बनवण्यासाठी नारळाच्या तेलात भृंगराजची पाने घाला आणि १० ते १५ मिनिटे शिजवा.आठवड्यातून दोनदा या तेलाने टाळूला मालिश करा. दोन तासांनी केस धुवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

13 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

13 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

13 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

13 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

15 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

15 तास ago