जरा काही खाल्ले की आपले पोट फुगते किंवा गॅसेसच्या समस्या होतात. अपचनाची समस्या ही सामान्य असली तरी सतत असं होणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरतं. या समस्यांमुळे आपल्याला अनेकदा खाण्याची इच्छा होत नाही. कधीकधी समस्या इतकी वाढते की, आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होतो. वारंवार पोट फुगण्याची समस्या किंवा गॅसेस होत असेल तर आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे.
बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, जंक फूड आणि वेळवर न खाणे यामुळे आपल्याला अपचनाचा- गॅसेसचा त्रास होतो. या समस्या टाळण्यासाठी आपण वेळेवर जेवायला हवे. तसेच आपल्या खाण्याच्या प्रमाणाकडे देखील लक्ष द्यायला हवे. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्या पोटावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. जर आपल्यालाही वारंवार पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा गॅसेसचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक ड्रिंक प्या, ज्यामुळे रोजचा त्रास कमी होण्यास मदत होईल. गॅस- अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपण अनेक औषधे खातो. परंतु, यामुळे आपल्याला आराम मिळत नाही. या समस्येवर आपण नैसर्गिक पद्धतीने आराम मिळवू शकतो. त्यासाठी एक खास आयुर्वेदिक पेय बनवून पिऊ शकता.
पेय कसे बनवाल
1) हे पेय बनवण्यासाठी आपल्याला ४ हिरवी वेलची, १ चमचा बेडीशेप आणि १ चमचा जिरे घ्यावं लागेल.
2) हे तिन्ही पदार्थ पाण्यात उकळवून घ्या. पाणी अर्धे झाले की, गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या.
आयुर्वेदिक ड्रिंकचे फायदे
1) बडीशेपमध्ये आढळणारे संयुगे हे गॅस्ट्रिक एंजाइम्स्ना चालना देण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
2) वेलची खाल्ल्याने अन्न लवकर पचते. यामुळे आपल्याला पोटदुखी, गॅस, अपचन आणि ॲसिडीटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
3) जिरे हे चांगले पचन होण्यासाठी सुपरफूड आहे. हे आपल्या पाचक एंजाइम्सच्या स्त्रावाला उत्तेजित करते. ज्यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…