१) पचन तंत्र सुधारत: हींगाचा जास्त फायदा पचन तंत्राला मिळतो. कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्याने अपचन, गॅस आणि पोटात जडपणा वाटणे या समस्या दूर होतात. तसेच अॅसिडिटीची समस्या देखील होत नाही. इतकंच नाही तर पोटातील सूजही याने कमी होते. ज्यांना नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो.
2) गॅस्ट्रिक समस्या: ही समस्या दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. जर पोटात नेहमीच गॅस होत असेल किंवा सूज असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करावं. या समस्या काही दिवसात दूर होतील. याने पोटातील अतिरिक्त गॅस बाहेर निघतो.
३) उचकी रोखण्यास फायदेशीर: जर सतत उचक्या लागत असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्यास आराम मिळेल. हींगाच्या सेवनाने उचकी लगेच बंद होईल. कारण याने तंत्रिका तंत्र शांत होतं आणि घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो.
४) बद्धकोष्ठतेची समस्या: कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
५) थकवा आणि कमजोरी: जर सतत थकवा आणि कमजोरी जाणवत असेल, तर कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास एनर्जी मिळेल आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहील. पोटासंबंधी समस्या दूर राहिल्यास आजारांचा धोकाही कमी राहतो.
६) शरीरात रक्त वाढत: हींगात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत मिळते. कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि शरीरात रक्त वाढवतं.
७) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल: हींगाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या लवचिक होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.
सेवन करण्याची पध्दत
कोमट पाण्यात चिमुटभर हींग टाका आणि चांगलं मिक्स करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन केल्यास अधिक फायदा मिळेल. सुरूवातीला हींगाच प्रमाण कमी ठेवा. हींग जास्त घ्याल तर समस्या होऊ शकते. हींगाचे अनेक फायदे असले तरी याच्या जास्त सेवनाने नुकसानही होऊ शकतं.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…
शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…