आरोग्य

कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करण्याचे फायदे

१) पचन तंत्र सुधारत: हींगाचा जास्त फायदा पचन तंत्राला मिळतो. कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्याने अपचन, गॅस आणि पोटात जडपणा वाटणे या समस्या दूर होतात. तसेच अ‍ॅसिडिटीची समस्या देखील होत नाही. इतकंच नाही तर पोटातील सूजही याने कमी होते. ज्यांना नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो.

2) गॅस्ट्रिक समस्या: ही समस्या दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. जर पोटात नेहमीच गॅस होत असेल किंवा सूज असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करावं. या समस्या काही दिवसात दूर होतील. याने पोटातील अतिरिक्त गॅस बाहेर निघतो.

३) उचकी रोखण्यास फायदेशीर: जर सतत उचक्या लागत असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्यास आराम मिळेल. हींगाच्या सेवनाने उचकी लगेच बंद होईल. कारण याने तंत्रिका तंत्र शांत होतं आणि घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो.

४) बद्धकोष्ठतेची समस्या: कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

५) थकवा आणि कमजोरी: जर सतत थकवा आणि कमजोरी जाणवत असेल, तर कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास एनर्जी मिळेल आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहील. पोटासंबंधी समस्या दूर राहिल्यास आजारांचा धोकाही कमी राहतो.

६) शरीरात रक्त वाढत: हींगात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत मिळते. कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि शरीरात रक्त वाढवतं.

७) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल: हींगाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या लवचिक होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.

सेवन करण्याची पध्दत

कोमट पाण्यात चिमुटभर हींग टाका आणि चांगलं मिक्स करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन केल्यास अधिक फायदा मिळेल. सुरूवातीला हींगाच प्रमाण कमी ठेवा. हींग जास्त घ्याल तर समस्या होऊ शकते. हींगाचे अनेक फायदे असले तरी याच्या जास्त सेवनाने नुकसानही होऊ शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

2 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

22 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

22 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

22 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

22 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

22 तास ago