जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तेच जर बडीशेपबाबत सांगायचं तर यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, अॅंटी ऑक्सिडेंट्स, एस्ट्रोगोल, फेनचोन आणि एथेनॉलसारखे गुण असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
गूळ आणि बडीशेपचे फायदे
१) पचनक्रिया सुधारते: जेवण केल्यानंतर छोटा गुळाचा तुकडा आणि बडीशेपचं केल्याने पचन चांगल्या पद्धतीने होतं आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासही मदत मिळते.
२) संधिवात होईल दूर: संधिवाताची समस्या दूर करण्यासाठी गूळ आणि बडीशेप खूप फायदेशीर ठरते. यातील गुणांमुळे संधिवातात होणारी वेदनाही दूर होते.
कसं कराल सेवन
तुम्ही जेवण झाल्यावर गूळ आणि बडीशेपचं सेवन असंच करू शकता. तसेच तुम्ही गूळ आणि बडीशेपचं चूर्णही तयार करू शकता. चूर्ण तयार करण्यासाठी बडीशेप, ओवा, वेलची बारीक करून घ्या. नंतर याचं तुम्ही दिवसा जेवणानंतर सेवन करू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…