जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तेच जर बडीशेपबाबत सांगायचं तर यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, अॅंटी ऑक्सिडेंट्स, एस्ट्रोगोल, फेनचोन आणि एथेनॉलसारखे गुण असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
गूळ आणि बडीशेपचे फायदे
१) पचनक्रिया सुधारते: जेवण केल्यानंतर छोटा गुळाचा तुकडा आणि बडीशेपचं केल्याने पचन चांगल्या पद्धतीने होतं आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासही मदत मिळते.
२) संधिवात होईल दूर: संधिवाताची समस्या दूर करण्यासाठी गूळ आणि बडीशेप खूप फायदेशीर ठरते. यातील गुणांमुळे संधिवातात होणारी वेदनाही दूर होते.
कसं कराल सेवन
तुम्ही जेवण झाल्यावर गूळ आणि बडीशेपचं सेवन असंच करू शकता. तसेच तुम्ही गूळ आणि बडीशेपचं चूर्णही तयार करू शकता. चूर्ण तयार करण्यासाठी बडीशेप, ओवा, वेलची बारीक करून घ्या. नंतर याचं तुम्ही दिवसा जेवणानंतर सेवन करू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…
गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…
ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव…