जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तेच जर बडीशेपबाबत सांगायचं तर यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, अॅंटी ऑक्सिडेंट्स, एस्ट्रोगोल, फेनचोन आणि एथेनॉलसारखे गुण असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
गूळ आणि बडीशेपचे फायदे
१) पचनक्रिया सुधारते: जेवण केल्यानंतर छोटा गुळाचा तुकडा आणि बडीशेपचं केल्याने पचन चांगल्या पद्धतीने होतं आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासही मदत मिळते.
२) संधिवात होईल दूर: संधिवाताची समस्या दूर करण्यासाठी गूळ आणि बडीशेप खूप फायदेशीर ठरते. यातील गुणांमुळे संधिवातात होणारी वेदनाही दूर होते.
कसं कराल सेवन
तुम्ही जेवण झाल्यावर गूळ आणि बडीशेपचं सेवन असंच करू शकता. तसेच तुम्ही गूळ आणि बडीशेपचं चूर्णही तयार करू शकता. चूर्ण तयार करण्यासाठी बडीशेप, ओवा, वेलची बारीक करून घ्या. नंतर याचं तुम्ही दिवसा जेवणानंतर सेवन करू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…