आरोग्य

तुप खाण्याचे फायदे

चपात्यांवर तूप लावल्यास त्याचा सुगंध संपूर्ण जेवणाला स्वादीष्ट बनवतो आणि तूप लावलेले पदार्थ खाल्ल्या नंतर पूर्ण थकवा काही क्षणात नाहीसा होतो. भारतीय स्वंयपाकघरात तूप फक्त चव वाढवण्या साठीच नाही तर परंपरा, आरोग्य आणि संस्कृती जपण्याची एक ओळख आहे. तूप खाल्ल्यानं त्वचा, केस चांगले राहण्यास मदत होते.

रात्रीच्या जेवणात तुपाचा समावेश केल्यास त्याचा सुगंध वाढतो आणि दिवसभराचा थकवा दूर होतो. भारतात तूप फक्त एक खाद्यपदार्थ नसून आपली संस्कृती, परंपरा आणि आरोग्याचा एक भाग आहे. तुपाला इंग्रजीत क्लॅरिफाईड बटर म्हणतात. लोणी मंद आचेवर गरम करून पाणी आणि दूधाचा अंश काढून तयार केले जाते. भारतीय संदर्भात याला तूप म्हणतात. हा शब्द संस्कृतातील घृत या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ शुद्ध तूप आहे.

तुपात ब्युटिरीक एसिड असते जे पचनक्रिया मजबूत बनवते. त्वचा आणि केसांसाठी योग्य ठरते. तुपात एंटी ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे त्वचा चांगली राहते आणि केस मजबूत होतात. तुपात ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात, जे हृदयाच्या कार्यासाठी गुणकारी ठरतात. तुपात कोलिन असते, जे शरीराची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. तुपाचा वापर उच्च तापमानावर ठेवलेलं अन्न शिजवण्यासाठी केला जातो. कारण याचा स्मोक पॉईंट उच्च असतो.

एक चमचा तुपाचे सेवन रोज केल्यास विशेषत: सकाळी रिकाम्यापोटी किंवा उपाशी पोटी केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. तुपाचा वापर पूजेसाठी, दिवा लावण्यासाठीही केला जातो. तूप आतड्यांचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्टता, मूळव्याध यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तूप त्वचेला खोलवर मॉईश्चराईज करते आणि त्वचा हायड्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहते. तूप खाल्ले की रूप येतं असं म्हटलं जातं, कारण तूप चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

22 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

22 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

22 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

1 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

1 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

1 दिवस ago