आरोग्य

सायंकाळी दुधाचा चहा कुणी प्यावा आणि कुणी टाळावा

चहा हे एक असं पेय आहे ज्याने जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात होते. चहा प्यायल्याशिवाय अनेकांचं एकही काम होत नाही. अनेकांना तर चहाची सवयच लागलेली असते. काही लोक सकाळी आणि सायंकाळी चहा पिणं पसंत करतात तर काही लोक दिवसातून कित्येक कप चहा पितात.

जास्त प्रमाणात चहाचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. खासकरून सायंकाळी चहाचं सेवन करणं जास्त नुकसानकारक ठरतं. हा दावा आमचा नाही तर आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यात सायंकाळी कुणी चहा प्यावा आणि कुणी टाळावा याबाबत सांगितलं आहे.

सायंकाळी चहा पिण्याचे नुकसान

चांगली झोप येण्यासाठी झोपण्याच्या १० तासांआधीपर्यंत कॅफीनचं सेवन टाळलं पाहिजे. सायंकाळी चहाचं सेवन टाळल्याने लिव्हर डिटॉक्स होण्यास, कार्टिसोल(सूज) कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते. अशात डॉक्टरांनी सांगितलं की, कुणी चहा प्यावा आणि कुणी पिऊ नये.

कुणी सायंकाळी चहा टाळावा 

ज्या लोकांना रात्री चांगली झोप येत नाही किंवा रात्री जाग येत असेल अशा लोकांनी सायंकाळी चहाचं सेवन टाळावं.

चिंता आणि तणावात असलेल्या लोकांनी सायंकाळी दुधाच्या चहाचं सेवन करू नये.

वाताची समस्या असलेले, ड्राय स्कीन असलेले आणि केसांची समस्या असलेल्या लोकांनी सायंकाळी चहा पिऊ नये.

वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी सायंकाळी चहा पिऊ नये.

भूक कमी लागण्याची समस्या असलेल्या लोकांनी चहा पिऊ नये.

हार्मोनसंबंधी समस्या असलेल्या लोकांनी चहाचं सेवन टाळलं पाहिजे.

जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर चहा टाळावा.

मेटाबॉलिक आणि ऑटो-इम्यून ची समस्या असणाऱ्यांची चहा टाळावा.

सायंकाळी चहा कोण पिऊ शकत

जे लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात.

असे लोक ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा गॅस समस्या नसेल.

जर तुमचं पचन तंत्र योग्य असेल.

जर तुम्हाला चहाची सवय नसेल तर

झोपेसंबंधी समस्या नसेल तर

रोज वेळेवर जेवण करणारे लोक

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

5 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

5 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

5 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

5 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

5 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

5 तास ago