कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही.
रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते.
नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. वारंवार अपुऱ्या झोपेमुळे मेंदूवरही ताण येतो, स्ट्रेस वाढतो. विस्मरणाचा त्रासही मागे लागण्याचा धोका असतोच.
त्यामुळेच झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. आता ज्या लोकांना रात्री लवकर झोप येत नाही ते डोक्याला मालिश करतात. पण त्याने म्हणावा तसा फायदा होत नाही.
कारण आयुर्वेदानुसार असे सांगण्यात आले आहे की आपल्या झोपेशी संबंधित जे पॉईंट किंवा बिंदू असतात ते तळपायामध्ये असतात.
त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला चोळून मसाज करा. हलक्या हाताने तळपाय दाबा. यामुळे ते पॉईंट व्यवस्थित दाबले जातील आणि पायातला रक्तपुरवठा वाढेल. याचा चांगला परिणाम तुमच्या झोपेवर दिसून येईल.
अंथरुणावर पडताच चटकन आणि शांत झोप लागेल. काही दिवस हा उपाय करून पाहा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…