शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

आरोग्य

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही.

रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते.

नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. वारंवार अपुऱ्या झोपेमुळे मेंदूवरही ताण येतो, स्ट्रेस वाढतो. विस्मरणाचा त्रासही मागे लागण्याचा धोका असतोच.

त्यामुळेच झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. आता ज्या लोकांना रात्री लवकर झोप येत नाही ते डोक्याला मालिश करतात. पण त्याने म्हणावा तसा फायदा होत नाही.

कारण आयुर्वेदानुसार असे सांगण्यात आले आहे की आपल्या झोपेशी संबंधित जे पॉईंट किंवा बिंदू असतात ते तळपायामध्ये असतात.

त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला चोळून मसाज करा. हलक्या हाताने तळपाय दाबा. यामुळे ते पॉईंट व्यवस्थित दाबले जातील आणि पायातला रक्तपुरवठा वाढेल. याचा चांगला परिणाम तुमच्या झोपेवर दिसून येईल.

अंथरुणावर पडताच चटकन आणि शांत झोप लागेल. काही दिवस हा उपाय करून पाहा.

(सोशल मीडियावरून साभार)