आरोग्य

थकवा येण्याचे कारण व उपाय

हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही. तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेडसावत असते. ‘काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं नाही’ अशीच गत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यात ही समस्या कायमची डोके दुखी होऊ शकते. त्यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडी जशी जशी वाढते तसा आळस वाढत असतो. हा आळस म्हणजेच थकवा असतो. शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारे थकवा असतो. आराम करून शारीरिक थकान चटकन आपण घालवू शकतो. मात्र मानसिक थकवा घालविण्यासाठी खूप अवधी लागत असतो. थकवा हा कोणत्या प्रकारचा आहे. हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र हा थकावा कशामुळे आला आहे. त्यावर उपाययोजना करणे हे आवश्यक असते.

झोप लवकर का लागते

जास्त प्रमाणात अंग मेहनत करणे, व्यायाम करणे.

झोप पूर्ण न होणे.

अधिक तनावात राहणे.

शरीरात रक्त कमी असणे, अशक्तपणा.

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असणे.

थकव्याची लक्षणे

हिवाळ्यात अधिक थकवा येत असल्याने उत्साह कमी होतो. त्यामुळे थकव्याची लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना केली पाहिजे.

कामात मन न लागणे. नकारात्मक विचारामध्ये वाढ होणे.

अशक्तपणा येणे, दिवसरात्र झोप लागणे.

थकवा दूर करण्याचे उपाय

हिवाळयात उन्हात उभे राहिल्याने शरीरात स्फूर्ति येत असते. थकवाही हळू हळू कमी होत असतो.

हाताच्या दोन बोटांनी चेहर्‍यावर हलकीशी मालिश करावी. तसे केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच मन व शरीरावरील ताण कमी होतो.

सुगंधित तेलाने शरीराची‍ मालिश केल्यानेही थकवा दूर केला जातो.

दररोज योग अथवा व्यायाम करावा, मात्र अति व्यायाम केल्याने ही थकवा येतो.

किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago