आरोग्य

कोथिंबिरीचा रस फायदे व तोटे

कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे 

1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात आणि पचनक्रिया सुधारते. गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

२) या रसामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतात.

३) कोथिंबिरीच्या रसामध्ये दाहकविरोधी(anti-inflammatory) आणि जीवाणूवाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म (antibacterial properties) असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात आणि त्वचा चमकदार होते.

४) कोथिंबिरीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे शरीराला आजाराचा सामना करण्यास बळ मिळते.

५) या रसाच्या सेवनाने प्री-डायबेटीज आणि इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

६) तसेच, कोथिंबिरीच्या रसाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करता येतो. हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले राहते.

७) हा रस प्यायल्याने चयापचय क्रिया व पचनक्रिया सुधारते. जर कोथिंबिरीचा रस संतुलित आहाराचा भाग बनविल्यास वजन कमी करण्यासाठीही मदत करतो.

८) ज्या लोकांना निद्रानाश किंवा झोपेशी संबंधित समस्या असेल, त्या रसाच्या सेवनाने त्या लोकांची झोपेची गुणवत्ता सुधारते.

कोथिंबिरीचा रस पिण्यामुळे होणारे त्रास खालीलप्रमाणे

अॅलर्जीची लक्षणे:- कोथिंबीर रसाच्या नियमित सेवनाने त्वचेवर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोट खराब होणे यांसारखी अॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात.

कमी रक्तदाब:- या रसाच्या नियमित सेवनाने रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन:- या रसाच्या नियमित सेवनाने अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन होऊ शकते. त्यामुळे विषाक्त घटकांसह शरीरास उपयुक्त असलेली काही आवश्यक खनिजे किंवा इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा कमी होऊ शकतात.

किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम:- कोथिंबीर हा लघवीचे प्रमाण वाढविणारा पदार्थ आहे. कोथिंबिरीचा रस किडनीला अधिक पाणी आणि मीठ उत्सर्जित करण्यास उत्तेजित करतो. त्यामुळे किडनीवर ताण येतो आणि तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होऊ शकतात.

कोथिंबिरीचा रस कसा बनवावा?

साहित्य

एक कप ताजी कोथिंबिरीची पाने

एक कप अननसाचे तुकडे

एक चमचा लिंबाचा रस

१ इंच आल्याचा तुकडा

१ कप नारळ पाणी किंवा साधे पाणी

बर्फाचे तुकडे

कृती

कोथिंबिरीची पाने, अननस, आले व नारळाचे पाणी एकत्र करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा.त्यानंतर हा रस गाळून घ्या (आवश्यकता असेल तर).त्यात लिंबाचा रस टाका आणि वरून बर्फाचे तुकडे टाका. अशा प्रकारे तुम्ही कोथिंबिरीचा रस तयार करू शकाल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

6 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago