आरोग्य

कोथिंबिरीचा रस फायदे व तोटे

कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे 

1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात आणि पचनक्रिया सुधारते. गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

२) या रसामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतात.

३) कोथिंबिरीच्या रसामध्ये दाहकविरोधी(anti-inflammatory) आणि जीवाणूवाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म (antibacterial properties) असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात आणि त्वचा चमकदार होते.

४) कोथिंबिरीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे शरीराला आजाराचा सामना करण्यास बळ मिळते.

५) या रसाच्या सेवनाने प्री-डायबेटीज आणि इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

६) तसेच, कोथिंबिरीच्या रसाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करता येतो. हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले राहते.

७) हा रस प्यायल्याने चयापचय क्रिया व पचनक्रिया सुधारते. जर कोथिंबिरीचा रस संतुलित आहाराचा भाग बनविल्यास वजन कमी करण्यासाठीही मदत करतो.

८) ज्या लोकांना निद्रानाश किंवा झोपेशी संबंधित समस्या असेल, त्या रसाच्या सेवनाने त्या लोकांची झोपेची गुणवत्ता सुधारते.

कोथिंबिरीचा रस पिण्यामुळे होणारे त्रास खालीलप्रमाणे

अॅलर्जीची लक्षणे:- कोथिंबीर रसाच्या नियमित सेवनाने त्वचेवर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोट खराब होणे यांसारखी अॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात.

कमी रक्तदाब:- या रसाच्या नियमित सेवनाने रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन:- या रसाच्या नियमित सेवनाने अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन होऊ शकते. त्यामुळे विषाक्त घटकांसह शरीरास उपयुक्त असलेली काही आवश्यक खनिजे किंवा इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा कमी होऊ शकतात.

किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम:- कोथिंबीर हा लघवीचे प्रमाण वाढविणारा पदार्थ आहे. कोथिंबिरीचा रस किडनीला अधिक पाणी आणि मीठ उत्सर्जित करण्यास उत्तेजित करतो. त्यामुळे किडनीवर ताण येतो आणि तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होऊ शकतात.

कोथिंबिरीचा रस कसा बनवावा?

साहित्य

एक कप ताजी कोथिंबिरीची पाने

एक कप अननसाचे तुकडे

एक चमचा लिंबाचा रस

१ इंच आल्याचा तुकडा

१ कप नारळ पाणी किंवा साधे पाणी

बर्फाचे तुकडे

कृती

कोथिंबिरीची पाने, अननस, आले व नारळाचे पाणी एकत्र करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा.त्यानंतर हा रस गाळून घ्या (आवश्यकता असेल तर).त्यात लिंबाचा रस टाका आणि वरून बर्फाचे तुकडे टाका. अशा प्रकारे तुम्ही कोथिंबिरीचा रस तयार करू शकाल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

13 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago