तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी प्यावेसं वाटू शकतं. पण जर तुम्हाला दिवसभर वारंवार तहान लागत असेल, पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच घसा पुन्हा कोरडा होत तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कधीकधी ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ती सवय बनली तर ती काही आजारांचं सुरुवातीचं लक्षण देखील असू शकत.
डायबेटीस
वारंवार तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण डायबेटीस असू शकतं. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल जास्त असते तेव्हा किडनीला ते फिल्टर करण्यासाठी जास्त त्रास होतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि वारंवार तहान लागते.
डिहायड्रेशन
गरम होणं, जास्त घाम येणं, उलट्या होणं किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू शकते. या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. यामुळे वारंवार तहान लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
हाय सोडियम लेव्हल
जर तुम्ही जास्त मीठ किंवा फास्ट फूड खाल्लं तर वारंवार तहान लागू शकते. शरीराला मीठ संतुलित करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, जेव्हा सोडियमची लेव्हल जास्त असते तेव्हा व्यक्तीला वारंवार तहान लागते.
ताप किंवा इन्फेक्शन
जेव्हा ताप किंवा इन्फेक्शन होतो तेव्हा शरीर गरम होतं आणि जास्त पाण्याची गरज भासते. विशेषतः व्हायरल ताप किंवा यूरिन इन्फेक्शनमुळे तहान वाढू शकते.
निद्रानाश किंवा स्ट्रेस
झोपेचा अभाव आणि मानसिक ताण शरीरातील द्रवपदार्थ संतुलनावर परिणाम करू शकतो. यामुळे पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्ही या समस्येशी बराच काळ सामना करत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.
डायबेटीस इन्सिपिडस
ही एक वेगळ्या प्रकारची वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीर पाणी टिकवून ठेवू शकत नाही. यामुळे वारंवार लघवी होते आणि जास्त तहान लागते. जर या प्रकारची समस्या गंभीर वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…