आरोग्य

तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? ‘या’ गंभीर आजारांचे संकेत…

तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी प्यावेसं वाटू शकतं. पण जर तुम्हाला दिवसभर वारंवार तहान लागत असेल, पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच घसा पुन्हा कोरडा होत तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कधीकधी ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ती सवय बनली तर ती काही आजारांचं सुरुवातीचं लक्षण देखील असू शकत.

डायबेटीस

वारंवार तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण डायबेटीस असू शकतं. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल जास्त असते तेव्हा किडनीला ते फिल्टर करण्यासाठी जास्त त्रास होतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि वारंवार तहान लागते.

डिहायड्रेशन

गरम होणं, जास्त घाम येणं, उलट्या होणं किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू शकते. या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. यामुळे वारंवार तहान लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

हाय सोडियम लेव्हल

जर तुम्ही जास्त मीठ किंवा फास्ट फूड खाल्लं तर वारंवार तहान लागू शकते. शरीराला मीठ संतुलित करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, जेव्हा सोडियमची लेव्हल जास्त असते तेव्हा व्यक्तीला वारंवार तहान लागते.

ताप किंवा इन्फेक्शन

जेव्हा ताप किंवा इन्फेक्शन होतो तेव्हा शरीर गरम होतं आणि जास्त पाण्याची गरज भासते. विशेषतः व्हायरल ताप किंवा यूरिन इन्फेक्शनमुळे तहान वाढू शकते.

निद्रानाश किंवा स्ट्रेस

झोपेचा अभाव आणि मानसिक ताण शरीरातील द्रवपदार्थ संतुलनावर परिणाम करू शकतो. यामुळे पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्ही या समस्येशी बराच काळ सामना करत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.

डायबेटीस इन्सिपिडस

ही एक वेगळ्या प्रकारची वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीर पाणी टिकवून ठेवू शकत नाही. यामुळे वारंवार लघवी होते आणि जास्त तहान लागते. जर या प्रकारची समस्या गंभीर वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

14 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

16 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

21 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

21 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

21 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

21 तास ago