आरोग्य

तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? ‘या’ गंभीर आजारांचे संकेत…

तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी प्यावेसं वाटू शकतं. पण जर तुम्हाला दिवसभर वारंवार तहान लागत असेल, पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच घसा पुन्हा कोरडा होत तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कधीकधी ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ती सवय बनली तर ती काही आजारांचं सुरुवातीचं लक्षण देखील असू शकत.

डायबेटीस

वारंवार तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण डायबेटीस असू शकतं. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल जास्त असते तेव्हा किडनीला ते फिल्टर करण्यासाठी जास्त त्रास होतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि वारंवार तहान लागते.

डिहायड्रेशन

गरम होणं, जास्त घाम येणं, उलट्या होणं किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू शकते. या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. यामुळे वारंवार तहान लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

हाय सोडियम लेव्हल

जर तुम्ही जास्त मीठ किंवा फास्ट फूड खाल्लं तर वारंवार तहान लागू शकते. शरीराला मीठ संतुलित करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, जेव्हा सोडियमची लेव्हल जास्त असते तेव्हा व्यक्तीला वारंवार तहान लागते.

ताप किंवा इन्फेक्शन

जेव्हा ताप किंवा इन्फेक्शन होतो तेव्हा शरीर गरम होतं आणि जास्त पाण्याची गरज भासते. विशेषतः व्हायरल ताप किंवा यूरिन इन्फेक्शनमुळे तहान वाढू शकते.

निद्रानाश किंवा स्ट्रेस

झोपेचा अभाव आणि मानसिक ताण शरीरातील द्रवपदार्थ संतुलनावर परिणाम करू शकतो. यामुळे पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्ही या समस्येशी बराच काळ सामना करत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.

डायबेटीस इन्सिपिडस

ही एक वेगळ्या प्रकारची वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीर पाणी टिकवून ठेवू शकत नाही. यामुळे वारंवार लघवी होते आणि जास्त तहान लागते. जर या प्रकारची समस्या गंभीर वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरूडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…

2 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago