तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी प्यावेसं वाटू शकतं. पण जर तुम्हाला दिवसभर वारंवार तहान लागत असेल, पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच घसा पुन्हा कोरडा होत तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कधीकधी ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ती सवय बनली तर ती काही आजारांचं सुरुवातीचं लक्षण देखील असू शकत.
डायबेटीस
वारंवार तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण डायबेटीस असू शकतं. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल जास्त असते तेव्हा किडनीला ते फिल्टर करण्यासाठी जास्त त्रास होतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि वारंवार तहान लागते.
डिहायड्रेशन
गरम होणं, जास्त घाम येणं, उलट्या होणं किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू शकते. या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. यामुळे वारंवार तहान लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
हाय सोडियम लेव्हल
जर तुम्ही जास्त मीठ किंवा फास्ट फूड खाल्लं तर वारंवार तहान लागू शकते. शरीराला मीठ संतुलित करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, जेव्हा सोडियमची लेव्हल जास्त असते तेव्हा व्यक्तीला वारंवार तहान लागते.
ताप किंवा इन्फेक्शन
जेव्हा ताप किंवा इन्फेक्शन होतो तेव्हा शरीर गरम होतं आणि जास्त पाण्याची गरज भासते. विशेषतः व्हायरल ताप किंवा यूरिन इन्फेक्शनमुळे तहान वाढू शकते.
निद्रानाश किंवा स्ट्रेस
झोपेचा अभाव आणि मानसिक ताण शरीरातील द्रवपदार्थ संतुलनावर परिणाम करू शकतो. यामुळे पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्ही या समस्येशी बराच काळ सामना करत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.
डायबेटीस इन्सिपिडस
ही एक वेगळ्या प्रकारची वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीर पाणी टिकवून ठेवू शकत नाही. यामुळे वारंवार लघवी होते आणि जास्त तहान लागते. जर या प्रकारची समस्या गंभीर वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…