आरोग्य

वजन कमी करण्यासाठी ही खिचडी खा…

वजन कमी करण्यासाठी खिचडी खाण्याचे फायदे

डायटिशियन आदिती शर्मा यांच्यामते खिचडी खाल्ल्यानं शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित होते. खिचडी खाऊन तुम्ही दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला ओव्हरइटींग होणार नाही आणि कॅलरीज इंटेकही कमी राहील. ज्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळेल आणि वर्कआऊटदरम्यान लवकर थकवा येणार नाही. शरीर जास्तीत जास्त फॅट बर्न करेल.

फायबर्सची उच्च गुणवत्ता:- खिचडीत उच्च प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. भूक नियंत्रित राहते, फॅट लॉस होण्यास मदत होते. रोज गरमागरम खिचडी खायला हवी.

संतुलित मॅक्रोन्युट्रिएंट्स:- खिचडीतील तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे. या डाळीतून शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळते. खिचडी खाल्ल्यानं मांसपेशींना पोषक तत्व मिळतात.

लो ग्लायसेमिक इंडेक्स:- खिचडीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. याचा अर्थ असा की ब्लड फ्लोमध्ये हळूहळू ग्लुकोज सोडलं जातं. ज्यामुले रक्तातील साखरेची वाढ रोखता येते. खिचडीचे नियमित सेवन केल्यानं ब्लड शुगर स्पाईक होण्यापासून रोखता येतं.

फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी:- खिचडीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी एक चांगला पर्याय आहे. वेट मॅनेजमेंटसाठी हा उपयुक्त उपाय आहे. खिचडी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम आहार आहे.

पचनक्रिया चांगली राहते:- खिचडीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. जे आतड्यांत हेल्दी बॅक्टेरियांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. पचनक्रियेत सुधारणा होऊन आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय संतुलित पचनक्रिया शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत करते.

प्रोटीनचा चांगला स्त्रोत:- खिचडी बनवण्यासाठी मुख्य स्वरूपात डाळींचा वापर केला जातो. डाळ एक प्लांट बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. याचे सेवन केल्यानं तुम्ही दीर्घकाळ संतुष्ट राहू शकता. याशिवाय मांसपेशींचा विकास होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

4 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

8 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

8 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

8 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

8 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

11 तास ago