वजन कमी करण्यासाठी खिचडी खाण्याचे फायदे
डायटिशियन आदिती शर्मा यांच्यामते खिचडी खाल्ल्यानं शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित होते. खिचडी खाऊन तुम्ही दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला ओव्हरइटींग होणार नाही आणि कॅलरीज इंटेकही कमी राहील. ज्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळेल आणि वर्कआऊटदरम्यान लवकर थकवा येणार नाही. शरीर जास्तीत जास्त फॅट बर्न करेल.
फायबर्सची उच्च गुणवत्ता:- खिचडीत उच्च प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. भूक नियंत्रित राहते, फॅट लॉस होण्यास मदत होते. रोज गरमागरम खिचडी खायला हवी.
संतुलित मॅक्रोन्युट्रिएंट्स:- खिचडीतील तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे. या डाळीतून शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळते. खिचडी खाल्ल्यानं मांसपेशींना पोषक तत्व मिळतात.
लो ग्लायसेमिक इंडेक्स:- खिचडीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. याचा अर्थ असा की ब्लड फ्लोमध्ये हळूहळू ग्लुकोज सोडलं जातं. ज्यामुले रक्तातील साखरेची वाढ रोखता येते. खिचडीचे नियमित सेवन केल्यानं ब्लड शुगर स्पाईक होण्यापासून रोखता येतं.
फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी:- खिचडीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी एक चांगला पर्याय आहे. वेट मॅनेजमेंटसाठी हा उपयुक्त उपाय आहे. खिचडी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम आहार आहे.
पचनक्रिया चांगली राहते:- खिचडीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. जे आतड्यांत हेल्दी बॅक्टेरियांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. पचनक्रियेत सुधारणा होऊन आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय संतुलित पचनक्रिया शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत करते.
प्रोटीनचा चांगला स्त्रोत:- खिचडी बनवण्यासाठी मुख्य स्वरूपात डाळींचा वापर केला जातो. डाळ एक प्लांट बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. याचे सेवन केल्यानं तुम्ही दीर्घकाळ संतुष्ट राहू शकता. याशिवाय मांसपेशींचा विकास होण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…