सर्दी झाल्यावर कोणत्या गोष्टी करू नये?
१. लगेचच गोळ्या- औषधी घेणे:- आपल्याला सर्दी होणार अशी चिन्हं दिसू लागली की लगेचच काही जण गोळ्या- औषधी घेऊन सर्दी दाबून टाकतात. पण असं करणं चुकीचं आहे. सर्दीमुळे आपल्या शरीरात जो म्युकस तयार झाला आहे, तो शरीराबाहेर पडणं गरजेचं आहे. कारण कोणत्यातरी ॲलर्जीमुळे, दुषित पदार्थ शरीरात गेल्यामुळे सर्दी होते आणि म्युकसच्या माध्यमातून ते घटक शरीराबाहेर पडत असतात. त्यामुळे ही प्रक्रिया गोळ्या घेऊन बंद करून टाकू नका, असं डॉक्टर सांगतात.
२. वाफ न घेणे:- कारण वाफ घेतल्यामुळे नाक, घसा या भागात साचलेला कफ, म्युकस मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी झाल्यावर वाफ घेण्याचा कंटाळा करू नका.
३. मध घेण्याची चुकीची पद्धत:- अनेकजण सर्दी झाल्यावर गरम पाण्यात मध टाकून पितात. पण ही चुकीची पद्धत आहे. सर्दी झाल्यावर आवर्जून मध खा. कारण तो सर्दी- खोकला बरा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण तो पाण्यात टाकून पिऊ नका. त्याऐवजी एका चमच्यामध्ये मध घ्या. त्यामध्ये मीरेपूड, हळद, दालचिनी टाकून तो तसाच चाटून घ्या. या पद्धतीने मध घेतल्यास लवकर आराम मिळेल.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…