सर्दी झाल्यावर कोणत्या गोष्टी करू नये?
१. लगेचच गोळ्या- औषधी घेणे:- आपल्याला सर्दी होणार अशी चिन्हं दिसू लागली की लगेचच काही जण गोळ्या- औषधी घेऊन सर्दी दाबून टाकतात. पण असं करणं चुकीचं आहे. सर्दीमुळे आपल्या शरीरात जो म्युकस तयार झाला आहे, तो शरीराबाहेर पडणं गरजेचं आहे. कारण कोणत्यातरी ॲलर्जीमुळे, दुषित पदार्थ शरीरात गेल्यामुळे सर्दी होते आणि म्युकसच्या माध्यमातून ते घटक शरीराबाहेर पडत असतात. त्यामुळे ही प्रक्रिया गोळ्या घेऊन बंद करून टाकू नका, असं डॉक्टर सांगतात.
२. वाफ न घेणे:- कारण वाफ घेतल्यामुळे नाक, घसा या भागात साचलेला कफ, म्युकस मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी झाल्यावर वाफ घेण्याचा कंटाळा करू नका.
३. मध घेण्याची चुकीची पद्धत:- अनेकजण सर्दी झाल्यावर गरम पाण्यात मध टाकून पितात. पण ही चुकीची पद्धत आहे. सर्दी झाल्यावर आवर्जून मध खा. कारण तो सर्दी- खोकला बरा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण तो पाण्यात टाकून पिऊ नका. त्याऐवजी एका चमच्यामध्ये मध घ्या. त्यामध्ये मीरेपूड, हळद, दालचिनी टाकून तो तसाच चाटून घ्या. या पद्धतीने मध घेतल्यास लवकर आराम मिळेल.
(सोशल मीडियावरून साभार)
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…