आपण शाळेत शिकलो आहोत की ‘जल हेच जीवन.’ माणसाचे शरीर ६० ते ७० टक्के पाण्याचे बनले आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे फारच गरजेचे असते. पचनसंस्थेपासून चेतासंस्थेपर्यंत सगळ्याच शारीरिक संस्थांना पाण्याची गरज असते. ऋतू बदलला की शरीरासाठी पाण्याची गरजही बदलते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायले जाते. तसेच उन्हाळा आला की आपण गटागट तांब्याच्या तांबे संपवून टाकतो. तरी पाण्याची तहान काही भागत नाही. प्रमाण कमी जास्त होते मात्र पाणी पिणे ही क्रिया सातत्याने घडत असते.
वजनानुसार पाण्याची आवश्यकता ठरते. मात्र शरीराला रोज सुमारे ३ लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाणी पिणे ही फारच सामान्य क्रिया आहे त्यामुळे आपण त्याबद्दल फार विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण पाणी पिताना चूक करतो. सात्विक मुव्हमेंटची फाऊंडर सुबा सराफ सांगते, जर या चुका टाळल्या नाहीत तर, त्यांचे परिणाम वाईट होऊ शकतात.
१) गटागट पाणी पिणे
कधीकधी घशाला फारच कोरड पडते. मग आपण पाणी गटागट एका श्वासात पिऊन टाकतो. पाणी एकदम पटकन प्यायल्यावर शरीराला एक झटका बसतो. तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पाणी चघळून प्यावे.
२) पाण्याचे तापमान
पाणी पिताना ते अति थंडही असू नये किंवा अति गरमही असू नये. शरीराला पाणी पचवण्यासाठी खरंतर कष्ट लागत नाहीत. पण जर पाण्याचे तापमान चुकले तर मग शरीराला त्रास होतो. त्यामुळे पाणी पिताना त्याचा चटका बसणार नाही आणि ठणकाही बसणार नाही याची काळजी घ्यावी.
३) जेवताना पाणी पिणे
जेवताना पाणी प्यायल्याने भुकेचे गणित चुकते. ठसका लागल्यावर पिणे, काही तिखट लागल्यावर पिणे वेगळी गोष्ट आहे. पण उगाच पाणी पिणे टाळावे. कारण पाण्यामुळे पचनक्रियेचा कालावधी वाढतो आणि पाणी जिरल्यावर पुन्हा भूक लागते.
४) प्लास्टिकचा वापर.
पाणी पिताना ते आपण कशातून पितो हे पाहणेही गरजेचे असते. प्लास्टिकच्या बाटलीतून किंवा ग्लासमधून पाणी पिताना, प्लास्टिकचे काही अंश पोटात जातात. ते शरीरासाठी हानिकारक आहेत. पाणी पिताना धातुंच्या भांड्यांचा वापर करावा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…