आरोग्य

पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

आपण शाळेत शिकलो आहोत की ‘जल हेच जीवन.’ माणसाचे शरीर ६० ते ७० टक्के पाण्याचे बनले आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे फारच गरजेचे असते. पचनसंस्थेपासून चेतासंस्थेपर्यंत सगळ्याच शारीरिक संस्थांना पाण्याची गरज असते. ऋतू बदलला की शरीरासाठी पाण्याची गरजही बदलते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायले जाते. तसेच उन्हाळा आला की आपण गटागट तांब्याच्या तांबे संपवून टाकतो. तरी पाण्याची तहान काही भागत नाही. प्रमाण कमी जास्त होते मात्र पाणी पिणे ही क्रिया सातत्याने घडत असते.

वजनानुसार पाण्याची आवश्यकता ठरते. मात्र शरीराला रोज सुमारे ३ लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाणी पिणे ही फारच सामान्य क्रिया आहे त्यामुळे आपण त्याबद्दल फार विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण पाणी पिताना चूक करतो. सात्विक मुव्हमेंटची फाऊंडर सुबा सराफ सांगते, जर या चुका टाळल्या नाहीत तर, त्यांचे परिणाम वाईट होऊ शकतात.

१) गटागट पाणी पिणे

कधीकधी घशाला फारच कोरड पडते. मग आपण पाणी गटागट एका श्वासात पिऊन टाकतो. पाणी एकदम पटकन प्यायल्यावर शरीराला एक झटका बसतो. तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पाणी चघळून प्यावे.

२) पाण्याचे तापमान

पाणी पिताना ते अति थंडही असू नये किंवा अति गरमही असू नये. शरीराला पाणी पचवण्यासाठी खरंतर कष्ट लागत नाहीत. पण जर पाण्याचे तापमान चुकले तर मग शरीराला त्रास होतो. त्यामुळे पाणी पिताना त्याचा चटका बसणार नाही आणि ठणकाही बसणार नाही याची काळजी घ्यावी.

३) जेवताना पाणी पिणे

जेवताना पाणी प्यायल्याने भुकेचे गणित चुकते. ठसका लागल्यावर पिणे, काही तिखट लागल्यावर पिणे वेगळी गोष्ट आहे. पण उगाच पाणी पिणे टाळावे. कारण पाण्यामुळे पचनक्रियेचा कालावधी वाढतो आणि पाणी जिरल्यावर पुन्हा भूक लागते.

४) प्लास्टिकचा वापर.

पाणी पिताना ते आपण कशातून पितो हे पाहणेही गरजेचे असते. प्लास्टिकच्या बाटलीतून किंवा ग्लासमधून पाणी पिताना, प्लास्टिकचे काही अंश पोटात जातात. ते शरीरासाठी हानिकारक आहेत. पाणी पिताना धातुंच्या भांड्यांचा वापर करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…

19 मिनिटे ago

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

3 तास ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

6 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago