आरोग्य

पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

आपण शाळेत शिकलो आहोत की ‘जल हेच जीवन.’ माणसाचे शरीर ६० ते ७० टक्के पाण्याचे बनले आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे फारच गरजेचे असते. पचनसंस्थेपासून चेतासंस्थेपर्यंत सगळ्याच शारीरिक संस्थांना पाण्याची गरज असते. ऋतू बदलला की शरीरासाठी पाण्याची गरजही बदलते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायले जाते. तसेच उन्हाळा आला की आपण गटागट तांब्याच्या तांबे संपवून टाकतो. तरी पाण्याची तहान काही भागत नाही. प्रमाण कमी जास्त होते मात्र पाणी पिणे ही क्रिया सातत्याने घडत असते.

वजनानुसार पाण्याची आवश्यकता ठरते. मात्र शरीराला रोज सुमारे ३ लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाणी पिणे ही फारच सामान्य क्रिया आहे त्यामुळे आपण त्याबद्दल फार विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण पाणी पिताना चूक करतो. सात्विक मुव्हमेंटची फाऊंडर सुबा सराफ सांगते, जर या चुका टाळल्या नाहीत तर, त्यांचे परिणाम वाईट होऊ शकतात.

१) गटागट पाणी पिणे

कधीकधी घशाला फारच कोरड पडते. मग आपण पाणी गटागट एका श्वासात पिऊन टाकतो. पाणी एकदम पटकन प्यायल्यावर शरीराला एक झटका बसतो. तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पाणी चघळून प्यावे.

२) पाण्याचे तापमान

पाणी पिताना ते अति थंडही असू नये किंवा अति गरमही असू नये. शरीराला पाणी पचवण्यासाठी खरंतर कष्ट लागत नाहीत. पण जर पाण्याचे तापमान चुकले तर मग शरीराला त्रास होतो. त्यामुळे पाणी पिताना त्याचा चटका बसणार नाही आणि ठणकाही बसणार नाही याची काळजी घ्यावी.

३) जेवताना पाणी पिणे

जेवताना पाणी प्यायल्याने भुकेचे गणित चुकते. ठसका लागल्यावर पिणे, काही तिखट लागल्यावर पिणे वेगळी गोष्ट आहे. पण उगाच पाणी पिणे टाळावे. कारण पाण्यामुळे पचनक्रियेचा कालावधी वाढतो आणि पाणी जिरल्यावर पुन्हा भूक लागते.

४) प्लास्टिकचा वापर.

पाणी पिताना ते आपण कशातून पितो हे पाहणेही गरजेचे असते. प्लास्टिकच्या बाटलीतून किंवा ग्लासमधून पाणी पिताना, प्लास्टिकचे काही अंश पोटात जातात. ते शरीरासाठी हानिकारक आहेत. पाणी पिताना धातुंच्या भांड्यांचा वापर करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

6 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

6 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

6 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

6 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

6 तास ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

15 तास ago