आरोग्य

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा ‘हे’ ५ बदल, अपचन – डिहायड्रेशन होणार नाही

दिवसेंदिवस हळूहळू उन्हाच्या तडाख्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्याने जीव कासावीस होतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, तसे थकवा, डिहायड्रेशन, अंगाची लाही लाही होणे, पोटांत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावू लागतात. उन्हाळयात होणाऱ्या या शारीरिक समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे. खरंतर, प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे

उन्हाळ्यात जर आपण आपल्या आहारात काही आवश्यक बदल केले तर शरीराला थंडावा मिळेल सोबतच आपण दिवसभर उत्साही देखील राहू. उन्हाळ्यात वाढती उष्णता आणि उकाड्याने अनेक शारीरिक समस्या सतावू नये यासाठी या दिवसात आपल्या डाएटमध्ये काही खास बदल केले पाहिजेत. आहारातील अशा बदलांमुळे उन्हाळ्यांत शारीरिक समस्या त्रास न देता आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

उन्हाळयात आपल्या आहारात कोणते मुख्य बदल करायला हवेत

१) चहा कॉफी पिणे सोडून नैसर्गिक पेये पिण्यावर अधिक भर द्या

उन्हाळ्यात जास्त प्रमाणांत चहा, कॉफी पिल्याने शरीराचे नुकसान होते. एवढेच नाही तर जास्त प्रमाणांत चहा – कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी चहा – कॉफी ऐवजी, नारळ पाणी, बेल सरबत, कोकम सरबत, लिंबू पाणी आणि सत्तूचे सरबत अशी नैसर्गिक पेय पिण्यावर अधिक भर द्यावा. ही नैसर्गिक पेय शरीराला थंडावा देण्यासोबतच, शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील देण्यास मदत करतात.

२) दुधाऐवजी दही आणि ताक प्या 

उन्हाळ्यात, दुधाऐवजी दही आणि ताक यांचा आहारात समावेश करा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनसंस्था मजबूत ठेवते आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. ताकामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे डिहायड्रेशन रोखतात आणि पोट हलके ठेवतात. दह्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रथिने हाडे मजबूत करतात आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. आपण ताकामध्ये थोडासा पुदिना किंवा काळे मीठ घालून देखील पिऊ शकता, यामुळे दही आणि ताकाची चव आणि आरोग्यदायी फायदे आणखी वाढतात.

३) साखरयुक्त पेयांपेक्षा फळं – भाज्यांचे ताजे रस प्या

कॅन किंवा टिन मध्ये पॅकेजिंग केलेले रस आणि थंड पेये पिण्याऐवजी, घरीच तयार केलेल्या ताज्या फळांचा रस बनवा आणि प्या. लिंबू पाणी, टरबूजाचा रस आणि काकडी-लिंबूचे सरबत केवळ उष्णतेपासून आराम देत नाही तर शरीराला हायड्रेट देखील करतात.

४) मसालेदार – चमचमीत ग्रेव्हीच्या भाज्या खाण्यापेक्षा पचायला हलक्या भाज्या खाव्यात 

उन्हाळ्यात जड आणि मसालेदार अन्नपदार्थ तसेच जड आणि चमचमीत ग्रेव्हीच्या भाज्या खाण्याऐवजी पचायला हलक्या, पाणीदार आणि हिरव्या भाज्या खाव्यात. दुधी, भोपळा, पालक आणि टोमॅटो यांसारख्या भाज्या शरीराला थंडावा देतात आणि पचायलाही सोपे असतात. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होत नाहीत.

५) संध्याकाळच्या ड्राय स्नॅक्सच्या जागी ताजे सॅलॅड – फळं खा  

उन्हाळ्यात, तळलेले अन्न आणि पॅक केलेले स्नॅक्स खाण्याऐवजी, ताजी फळे आणि सॅलॅडला प्राधान्य द्या. काकडी, टोमॅटो, गाजर आणि मुळा यापासून बनवलेले सॅलॅड शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि पोट हलके ठेवते. याव्यतिरिक्त, त्यात फायबर आणि आवश्यक खनिजे असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात. हिरव्या पालेभाज्या आणि अंकुरलेले कडधान्ये उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही सॅलॅडमध्ये लिंबाचा रस आणि दही घातलं तर ते आणखी पौष्टिक बनते. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात छोटे बदल करणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार घेतल्याने तुम्ही फक्त डिहायड्रेशन आणि थकवा टाळू शकत नाही तर तुम्हाला हलके आणि उत्साही देखील वाटेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

24 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

24 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago