आपल्या शरीरात काही बदल झाले की आपल्याला त्याचे पूर्वसंकेत मिळू लागतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या खनिजांपैकी एक आहे. जे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागली की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, त्वचेच्या रंगात बदल होण्यापासून ते मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो. लोहाच्या कमतरतेमुळे शरीर आतून पोकळ होते. उठण्या-बसण्याचा देखील त्राण आपल्यात राहात नाही. आपल्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्याला सतत थकल्यासारखे वाटणे किंवा चक्कर येणे. श्वास घेण्यास अडचणी, त्वचेचा रंग बदलणे यांसारखी लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. हा फक्त ताण नसून लोहाच्या कमतरेती लक्षणे आहेत.
1) सतत थकवा येणे
जर आपल्याला सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल. थोडे काम केल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होत असेल तर ते लोहाच्या कमरतेमुळे असू शकते. लोहाची कमतरता झाल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवता येत नाही, ज्यामुळे लवकर थकवा येतो.
2) ओठांचा रंग बदलतो
रक्ताच्या कमरतेमुळे शरीराच्या अनेक भागात बदल होतात. त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. आपली त्वचा, ओठ किंवा डोळ्यांखालील भाग पिवळा किंवा पांढरा पडू लागतो. तसेच यामुळे चेहऱ्यावर असलेली चमक देखील कमी होते.
3) चक्कर येणे
शरीराला योग्य प्रमाणात लोह किंवा रक्तपुरवठा मिळाला नाही तर चक्कर येते. यामध्ये मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. सतत डोके दुखणे, चक्कर येणे किंवा डोके जड होणे यांसारख्या समस्या येतात.
4) श्वास घेण्यास अडचण
शारीरिक क्रियाकल्प वाढल्यास आपल्याला त्रास होऊ लागतो, हे देखील शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होते. अचानक हृदय जोरात धडधडणे, चालतना किंवा पायऱ्या चढताना त्रास होणे. शरीराला पुरेशा ऑक्सिजन मिळाला नाही की, असे होते.
5) केसगळती
लोहाच्या कमरतेचा आपल्या केसांवर आणि नखांवर देखील परिणाम होतो. ज्यामुळे केसगळती, नखांवर पांढरे किंवा पिवळे डाग येणे. नख सतत तुटणे किंवा नखे पातळ होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…