आरोग्य

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते.

तुप फक्त खाल्लेच नाही तर ते चेहऱ्यावर देखील लावले जाते. चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा ग्लो होण्यास मदत होते तसेच त्वचेचा पोत देखील सुधारतो. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, आणि ई असते. तसेच हेल्दी फॅट, कॅल्शियम आणि ओमेगा-३ सारखे गुणधर्म यात असतात. आपल्यापैकी अनेकांना तुप खाण्याची आणि चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे. परंतु, शरीराचे काही भाग असे आहेत जिथे तूप लावल्याने असंख्य आजार दूर होतात.

1) डोळ्यांमध्ये काजळसारखे तूप लावल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहाते. यामुळे सतत वापरल्या जाणाऱ्या स्क्रिनमुळे डोळ्यांवरील ताण हलका होतो. जर आपले डोळे सतत कोरडे होत असतील तर तुपाचा वापर करायला हवा. तसेच जर आपल्या डोळ्यांना सतत अंधारी येत असेल तर त्यांना टवटवीत करण्याचे काम देखील तूप करते.

2) नाक हा आपल्या शरीरात महत्त्वाचा अवयव. यातून आपल्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया होते. नाकात तूप घातल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. नाकात श्लेष्मा जमा झाला असेल तर त्वचा ओलसर करण्यासाठी आणि घाण बाहेर करण्यासाठी याचा वापर होतो. सतत चिडचिड होत असेल आणि मानसिक शांतता हवी असेल तर तूप यावर बहुगुणी ठरते.

3) शरीराचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली नाभी. नाभीमध्ये तूप घातल्याने पाचनाचे आरोग्य चांगले राहाते. पुनरुत्पादक आरोग्यदेखील सुधारते. त्वचा आणि केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तूप नाभीत टाकल्याने फायदा होतो.

4) अनेकदा खूप चालल्यानंतर आपल्या तळपायावर त्याचा अधिक भार येतो. ज्यामुळे त्याची आग होते. तळपायावर तूप घासल्याने डोके शांत होण्यास मदत होते. पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते. तुपामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा मिळते.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

1 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

2 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

2 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

2 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

2 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

3 तास ago