आरोग्य

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते.

तुप फक्त खाल्लेच नाही तर ते चेहऱ्यावर देखील लावले जाते. चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा ग्लो होण्यास मदत होते तसेच त्वचेचा पोत देखील सुधारतो. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, आणि ई असते. तसेच हेल्दी फॅट, कॅल्शियम आणि ओमेगा-३ सारखे गुणधर्म यात असतात. आपल्यापैकी अनेकांना तुप खाण्याची आणि चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे. परंतु, शरीराचे काही भाग असे आहेत जिथे तूप लावल्याने असंख्य आजार दूर होतात.

1) डोळ्यांमध्ये काजळसारखे तूप लावल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहाते. यामुळे सतत वापरल्या जाणाऱ्या स्क्रिनमुळे डोळ्यांवरील ताण हलका होतो. जर आपले डोळे सतत कोरडे होत असतील तर तुपाचा वापर करायला हवा. तसेच जर आपल्या डोळ्यांना सतत अंधारी येत असेल तर त्यांना टवटवीत करण्याचे काम देखील तूप करते.

2) नाक हा आपल्या शरीरात महत्त्वाचा अवयव. यातून आपल्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया होते. नाकात तूप घातल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. नाकात श्लेष्मा जमा झाला असेल तर त्वचा ओलसर करण्यासाठी आणि घाण बाहेर करण्यासाठी याचा वापर होतो. सतत चिडचिड होत असेल आणि मानसिक शांतता हवी असेल तर तूप यावर बहुगुणी ठरते.

3) शरीराचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली नाभी. नाभीमध्ये तूप घातल्याने पाचनाचे आरोग्य चांगले राहाते. पुनरुत्पादक आरोग्यदेखील सुधारते. त्वचा आणि केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तूप नाभीत टाकल्याने फायदा होतो.

4) अनेकदा खूप चालल्यानंतर आपल्या तळपायावर त्याचा अधिक भार येतो. ज्यामुळे त्याची आग होते. तळपायावर तूप घासल्याने डोके शांत होण्यास मदत होते. पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते. तुपामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा मिळते.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…

2 तास ago

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

19 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

23 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

23 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

23 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

23 तास ago