आरोग्य

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते.

तुप फक्त खाल्लेच नाही तर ते चेहऱ्यावर देखील लावले जाते. चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा ग्लो होण्यास मदत होते तसेच त्वचेचा पोत देखील सुधारतो. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, आणि ई असते. तसेच हेल्दी फॅट, कॅल्शियम आणि ओमेगा-३ सारखे गुणधर्म यात असतात. आपल्यापैकी अनेकांना तुप खाण्याची आणि चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे. परंतु, शरीराचे काही भाग असे आहेत जिथे तूप लावल्याने असंख्य आजार दूर होतात.

1) डोळ्यांमध्ये काजळसारखे तूप लावल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहाते. यामुळे सतत वापरल्या जाणाऱ्या स्क्रिनमुळे डोळ्यांवरील ताण हलका होतो. जर आपले डोळे सतत कोरडे होत असतील तर तुपाचा वापर करायला हवा. तसेच जर आपल्या डोळ्यांना सतत अंधारी येत असेल तर त्यांना टवटवीत करण्याचे काम देखील तूप करते.

2) नाक हा आपल्या शरीरात महत्त्वाचा अवयव. यातून आपल्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया होते. नाकात तूप घातल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. नाकात श्लेष्मा जमा झाला असेल तर त्वचा ओलसर करण्यासाठी आणि घाण बाहेर करण्यासाठी याचा वापर होतो. सतत चिडचिड होत असेल आणि मानसिक शांतता हवी असेल तर तूप यावर बहुगुणी ठरते.

3) शरीराचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली नाभी. नाभीमध्ये तूप घातल्याने पाचनाचे आरोग्य चांगले राहाते. पुनरुत्पादक आरोग्यदेखील सुधारते. त्वचा आणि केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तूप नाभीत टाकल्याने फायदा होतो.

4) अनेकदा खूप चालल्यानंतर आपल्या तळपायावर त्याचा अधिक भार येतो. ज्यामुळे त्याची आग होते. तळपायावर तूप घासल्याने डोके शांत होण्यास मदत होते. पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते. तुपामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा मिळते.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

4 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

8 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

9 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

9 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

9 तास ago