CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90?
वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. काही लोकांच्या डोळ्यातून खूप अश्रू येतात तर काही लोकांना अजिबातच रडू येत नाही. तर काही लोक डोळ्यातील अश्रू रडताना रोखून धरतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकत.
अश्रू रोखण्याचे नुकसान
जेव्हा आपण अश्रू रोखून ठेवतो, त्यांना वाट मोकळी करून देत नाही तेव्हा आपलं शरीर मानसिक आणि शारीरिक तणावात येतं. अश्रू निघाल्याने शरीराला आराम मिळतो आणि भावनांचं संतुलन कायम राहतं. पण जर अश्रू जबरदस्तीने रोखले तर यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. ज्यामुळे डिप्रेशन किंवा चिंता अशा गंभीर समस्या होऊ शकतात.
१) होऊ शकतो गंभीर आजार
अश्रू रोखल्याने केवळ मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो असं नाही तर शारीरिक आरोग्याचं देखील नुकसान होतं. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, अश्रू जबरदस्तीने रोखल्याने हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर आणि इतरही गंभीर समस्या होऊ शकतात.
२) अश्रू येऊ देणं गरजेच
जर तुमची रडायची ईच्छा असेल तर अश्रू येऊ द्या. याने तुमचं मानसिक आणि सोबतच शारीरिक आरोग्यही चांगलं राहील. अश्रू ढाळल्याने भावनात्मक तणाव कमी होतो, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमचं मन हलकं होतं.
३) रडणं म्हणजे कमजोर असणं नाही
रडले म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं नाही, उलट ही एक नॅचरल प्रोसेस आहे जे आपल्या भावनांना मार्ग मोकळा करण्याचं माध्यम आहे. जेव्हा आपण रडतो तेव्हा आपलं शरीर तणाव आणि भावनात्मक ओझ्यातून मुक्त होतं. रडणं हे दाखवतं की, आपण मनुष्य आहोत. ज्यांना भावना आहेत आणि त्या जिवंत आहेत. रडल्याने आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने मजबूत होतो. कारण याने तणाव कमी होतो आणि मन हलकं होतं. त्यामुळे रडण्यासाठी लाजू नका किंवा कुणी काय म्हणेल याचा विचार करू नका.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या…
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर करण्यात आलेल्या…
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेलच. आज बदललेली…