सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे सतत नवीन आजार जडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते.
जवसाचा शरीरावर होणारा चांगला प्रभाव
पेरिफेरल आर्टरी डिसीज असलेल्या लोकात ग्राउंड फ्लेक्ससीड्स खराब कोलेस्टेरॉल कमी करतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करणार्या औषधात एकत्रित केल्यावर शरीरातील कोलेस्टेरॉलवर परिणाम न होता अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता त्याच्यात असते. इतकंच नाही तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जवसाच्या बिया खूप चांगल्या आहेत. जवसामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे अनेक आजार दूर होतात. या कारणास्तव फ्लॅक्ससीड हे पृथ्वीवर आढळणारे सर्वात पौष्टिक अन्न आहे.
जवस लढते कोलेस्टेरॉलशी
प्राचीन काळापासून आहारात जवसाचा वापर होत आहे. जवस सोबत त्याचे तेल देखील वापरले जाते. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, चिनी आणि भारतीय संस्कृतीत याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्लेक्ससीड मध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड, विरघळणारे फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व पोषक खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कोलेस्टेरॉलच्या आजारावर उपयुक्त
फ्लेक्ससीड्स अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (एएलए) मध्ये समृद्ध असतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. यासोबतच ते इकोसापेंटायनोइक ॲसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्साएनोइक ॲसिड (डीएचए) मध्ये समृद्ध आहे. हे तिन्ही ॲसिड खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओळखले जातात. म्हणूनच कोलेस्टेरॉलच्या आजारावर जवस हे उपयुक्त आहे.
जवस रोज किती खावे
तज्ञांच्या मते, रोजच्या आहारात एक चमचा जवसाचा वापर केला पाहिजे. पण फ्लॅक्ससीड कधीही कच्चे खाऊ नका, नेहमी आधी भाजून घ्या आणि नंतर खा. त्याचे फायदे मिळविण्यासाठी, ते योग्य स्वरूपात खाणे आवश्यक आहे. तसेच ते अनेक ड्रायफ्रूट्स आणि संपूर्ण बियांसोबत भाजून खाऊ शकता.
जवसाच्या बिया भाजून, बारीक करून, स्मूदी, हलवा, लापशी, लाडू आणि दह्यात मिसळून खाता येतात. सर्वसाधारणपणे, प्रत्येकाने जवसाच्या तेलाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही, कारण त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त ऍसिड असतात, जे चुकीच्या प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जवसाचे सेवन करावे.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…