आरोग्य

केवळ एक लवंग खाण्याचे फायदे

आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात आहेत. पूर्वीच्या काळात अलोपॅथीक गोळ्या-औषधींना जास्त महत्व नसायचे. कारण पूर्वी डॉक्टर कमी आणि वैद्य जास्त असायचे. ते सर्व अलोपॅथी पेक्षा आयुर्वेदावर जास्त विश्वास करायचे. विशेष म्हणजे आयुर्वेदिक औषधीमुळे कुठलेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते.

आज आपण अशाच एका आयुर्वेदिक गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत, जी की बऱ्याच रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते. आज आपण माहिती घेणार आहोत लवंग विषयी. तसे बघायला गेलं तर लवंग एक प्रकारचा मसाला आहे, परंतु आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग बऱ्याच रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग ना आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते. तुम्ही या अगोदर लवंग चे शरीरास असणारे फायदे ऐकलेही असतील पण एवढ्या छोट्या लवंग चे शरीरास इतके सारे फायदे आहेत की तुम्ही ऐकलेही नसतील. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये अशा काही रोगांविषयी सांगणार आहोत, जे की एक लवंग खाल्याने ठीक होऊ शकतात. या रोगांसाठी तुम्हाला काही मोठा खर्च करून इलाज करण्याची गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरीच हे उपाय अवलंबून ठीक होऊ शकता.

लवंग खाल्याने होतात हे अद्भुत फायदे

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. वातावरण सात बदलले तर बऱ्याच जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. यावर उपचार म्हणून बरेच जण महागात महाग सिरप पितात तरी पण त्यांना यापासून सुटका मिळत नाही. यामुळे तुम्हाला जर खोखला पळवायचा असेल तर एक लवंग तोंडात ठेवा व तिला चावट राहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एव्हडी शी लवंग शरीरासाठी इतकी फायदेशीर आहे.

1) लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंध एका झटक्यात दूर होऊ शकतो आणि मोकळा आणि फ्रेश श्वास बनतो.

2) लवंगच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवला तर, जेव्हा पण तुमचे नाक बंद होईल किंवा सर्दी झाली तर एकदा वास घेतला तर तुमचे नाक झटक्यात मोकळे होईल.

3) ज्या लोकांना जळजळ म्हणजे ऍसिडिटी ची समस्या असते, त्यांनी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंग चा खिस करून चांगले मिसळून प्यावे. यामुळे तुमची ऍसिडिटी लवकर बरी होईल.

4) बरेच वेळा आपल्या घरातील वयस्कर व्यक्तीच्या जॉइंटमध्ये त्रास असतो. लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्याने बऱ्यापैकी त्रास कमी होईल.

5) ज्या लोकांना खूप तहान लागते किंवा जास्त घाम येतो, त्यांनी गरम पाण्यात लवंग वाटून पाण्यात मिसळून प्यावी. यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…

2 मिनिटे ago

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…

7 मिनिटे ago

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; NEP अंमलबजावणीला वेग

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…

42 मिनिटे ago

व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता

व्हिटॅमिन बी-१२ हे 'सायनोकोबालामिन' म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक…

1 तास ago

भाजलेल आल सांधेदुखीपासून वेटलॉसपर्यंत अनेक समस्यांवर असरदार

रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आलं घातलं जातं. खरंतर, 'आलं' मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक असून…

1 तास ago

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ५० हजारांची रोकड लंपास; स्वारगेट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध

पुणे : कामानिमित्त पुण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील प्रवाशाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात…

1 तास ago