१) सर्दी खोकला
उपाय:- लवंग , मनुका यांचा काढा व मध यांच्या गुळण्या कराव्यात. वेखंडाची धुरी घ्यावी. सुंठवडा खावा. ज्येष्ठमध काढा + मध व खडीसाखर घालून घ्यावा.
२) वारंवार तहान लागणे
उपाय:- खजूर पाण्यात भिजत ठेवावी, १ तासाने हे पाणी गाळून पिण्यास द्यावे. डाळिंबाचा रस प्यावा.
३) भूक न लागणे
उपाय:- ताजे ताक व वेलची पावडर + खडीसाखर घालून प्यावे. मूगडाळीचे सूप प्यावे.
४) पोटदुखी
उपाय:- पोटावर चंदनाचा लेप लावावा. गुलाब पाकळ्या पिण्याच्या पाण्यात टाकाव्यात व हे पाणी प्यावे.
५) वजन कमी होणे
उपाय:- 1 ग्लास दुध + १ चमचा शतावरी पावडर , आक्रोड , काजू पावडर खाण्यात ठेवावी. काळी खजूर तुपात भिजत ठेवावी , दररोज सकाळी २ व रात्री २ खजूर खाव्यात.
६) केस गळणे
उपाय:- बदाम तेलाने केसांना मसाज करावा.
७) स्त्रियांमध्ये अंगावरून जास्त जाणे
उपाय:- १ कप दुध + पाव चमचा सुंठ पावडर + १ चमचा शतावरी पावडर घ्यावी. गुलाब पाकळ्या व मध एकत्र करून खावे.
८) संडासावाटे रक्त पडणे
उपाय:- बेलचा मुरंबा खावा.
९) नाकातून रक्त येणे
उपाय:- दुर्वांचा रस २ थेंब नाकपुडीत टाकावा.
१०) डायबेटीस
उपाय:- हळद, जांभूळ बी पावडर व आवळा पावडर प्रत्येकी समभाग घेऊन सकाळी उपाशीपोटी खावी.
११) सांधेदुखी, कटकट आवाज येणे
उपाय:- हळदीने सिद्ध केलेल्या खोबरेल तेलात कापूर टाकून सांध्याना मसाज करावा. दुखणाऱ्या भागावर ज्येष्टमध पावडरचा लेप लावावा. १ कप दुध + १/२ चमचा डिंक पावडर + १ चमचा खारीक पावडर असे मिश्रण जेवणानंतर १ तासाने प्यावे.
१२) चक्कर येणे
उपाय:- सकाळी उपाशीपोटी मोरावळा खावा. डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यापैकी उपलब्ध असेल त्या फळाचा रस घ्यावा.
१३) मानसिक ताण
उपाय:- दीर्घश्वसन करा. अनुलोम – विलोम प्राणायम करा.
१४) मैथुन इच्छा उत्पन्न न होणे
उपाय:- तुपात केलेले उडीद पीठाचे लाडू खावेत. दुध व केशर रोज झोपण्यापूर्वी घ्यावे.
१५) संडासला कडा बनणे
उपाय:- १५ काळ्या मनुका रात्री पिण्याच्या पाण्यात भिजवाव्यात सकाळी उपाशीपोटी खाव्यात.
१६) लघवीला जळजळ होणे
उपाय:- १ ग्लास पाणी + १ चमचा धना पावडर + १ चमचा मध हे मिश्रण प्यावे.
१७) घामामुळे अंगाला दुर्गंध येणे
उपाय:- चंदन , कापूर पावडर अंगाला चोळावी.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…