आरोग्य

काही आजारांवर घरगुती उपाय

१) सर्दी खोकला

उपाय:- लवंग , मनुका यांचा काढा व मध यांच्या गुळण्या कराव्यात. वेखंडाची धुरी घ्यावी. सुंठवडा खावा. ज्येष्ठमध काढा + मध व खडीसाखर घालून घ्यावा.

२) वारंवार तहान लागणे

उपाय:- खजूर पाण्यात भिजत ठेवावी, १ तासाने हे पाणी गाळून पिण्यास द्यावे. डाळिंबाचा रस प्यावा.

३) भूक न लागणे

उपाय:- ताजे ताक व वेलची पावडर + खडीसाखर घालून प्यावे. मूगडाळीचे सूप प्यावे.

४) पोटदुखी

उपाय:- पोटावर चंदनाचा लेप लावावा. गुलाब पाकळ्या पिण्याच्या पाण्यात टाकाव्यात व हे पाणी प्यावे.

५) वजन कमी होणे

उपाय:- 1 ग्लास दुध + १ चमचा शतावरी पावडर , आक्रोड , काजू पावडर खाण्यात ठेवावी. काळी खजूर तुपात भिजत ठेवावी , दररोज सकाळी २ व रात्री २ खजूर खाव्यात.

६) केस गळणे

उपाय:- बदाम तेलाने केसांना मसाज करावा.

७) स्त्रियांमध्ये अंगावरून जास्त जाणे

उपाय:- १ कप दुध + पाव चमचा सुंठ पावडर + १ चमचा शतावरी पावडर घ्यावी. गुलाब पाकळ्या व मध एकत्र करून खावे.

८) संडासावाटे रक्त पडणे

उपाय:- बेलचा मुरंबा खावा.

९) नाकातून रक्त येणे

उपाय:- दुर्वांचा रस २ थेंब नाकपुडीत टाकावा.

१०) डायबेटीस

उपाय:- हळद, जांभूळ बी पावडर व आवळा पावडर प्रत्येकी समभाग घेऊन सकाळी उपाशीपोटी खावी.

११) सांधेदुखी, कटकट आवाज येणे

उपाय:- हळदीने सिद्ध केलेल्या खोबरेल तेलात कापूर टाकून सांध्याना मसाज करावा. दुखणाऱ्या भागावर ज्येष्टमध पावडरचा लेप लावावा. १ कप दुध + १/२ चमचा डिंक पावडर + १ चमचा खारीक पावडर असे मिश्रण जेवणानंतर १ तासाने प्यावे.

१२) चक्कर येणे

उपाय:- सकाळी उपाशीपोटी मोरावळा खावा. डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यापैकी उपलब्ध असेल त्या फळाचा रस घ्यावा.

१३) मानसिक ताण

उपाय:- दीर्घश्वसन करा. अनुलोम – विलोम प्राणायम करा.

१४) मैथुन इच्छा उत्पन्न न होणे

उपाय:- तुपात केलेले उडीद पीठाचे लाडू खावेत. दुध व केशर रोज झोपण्यापूर्वी घ्यावे.

१५) संडासला कडा बनणे

उपाय:- १५ काळ्या मनुका रात्री पिण्याच्या पाण्यात भिजवाव्यात सकाळी उपाशीपोटी खाव्यात.

१६) लघवीला जळजळ होणे

उपाय:- १ ग्लास पाणी + १ चमचा धना पावडर + १ चमचा मध हे मिश्रण प्यावे.

१७) घामामुळे अंगाला दुर्गंध येणे

उपाय:- चंदन , कापूर पावडर अंगाला चोळावी.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

7 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

7 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

7 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

7 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

12 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

12 तास ago