आरोग्य

काही आजारांवर घरगुती उपाय

१) सर्दी खोकला

उपाय:- लवंग , मनुका यांचा काढा व मध यांच्या गुळण्या कराव्यात. वेखंडाची धुरी घ्यावी. सुंठवडा खावा. ज्येष्ठमध काढा + मध व खडीसाखर घालून घ्यावा.

२) वारंवार तहान लागणे

उपाय:- खजूर पाण्यात भिजत ठेवावी, १ तासाने हे पाणी गाळून पिण्यास द्यावे. डाळिंबाचा रस प्यावा.

३) भूक न लागणे

उपाय:- ताजे ताक व वेलची पावडर + खडीसाखर घालून प्यावे. मूगडाळीचे सूप प्यावे.

४) पोटदुखी

उपाय:- पोटावर चंदनाचा लेप लावावा. गुलाब पाकळ्या पिण्याच्या पाण्यात टाकाव्यात व हे पाणी प्यावे.

५) वजन कमी होणे

उपाय:- 1 ग्लास दुध + १ चमचा शतावरी पावडर , आक्रोड , काजू पावडर खाण्यात ठेवावी. काळी खजूर तुपात भिजत ठेवावी , दररोज सकाळी २ व रात्री २ खजूर खाव्यात.

६) केस गळणे

उपाय:- बदाम तेलाने केसांना मसाज करावा.

७) स्त्रियांमध्ये अंगावरून जास्त जाणे

उपाय:- १ कप दुध + पाव चमचा सुंठ पावडर + १ चमचा शतावरी पावडर घ्यावी. गुलाब पाकळ्या व मध एकत्र करून खावे.

८) संडासावाटे रक्त पडणे

उपाय:- बेलचा मुरंबा खावा.

९) नाकातून रक्त येणे

उपाय:- दुर्वांचा रस २ थेंब नाकपुडीत टाकावा.

१०) डायबेटीस

उपाय:- हळद, जांभूळ बी पावडर व आवळा पावडर प्रत्येकी समभाग घेऊन सकाळी उपाशीपोटी खावी.

११) सांधेदुखी, कटकट आवाज येणे

उपाय:- हळदीने सिद्ध केलेल्या खोबरेल तेलात कापूर टाकून सांध्याना मसाज करावा. दुखणाऱ्या भागावर ज्येष्टमध पावडरचा लेप लावावा. १ कप दुध + १/२ चमचा डिंक पावडर + १ चमचा खारीक पावडर असे मिश्रण जेवणानंतर १ तासाने प्यावे.

१२) चक्कर येणे

उपाय:- सकाळी उपाशीपोटी मोरावळा खावा. डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यापैकी उपलब्ध असेल त्या फळाचा रस घ्यावा.

१३) मानसिक ताण

उपाय:- दीर्घश्वसन करा. अनुलोम – विलोम प्राणायम करा.

१४) मैथुन इच्छा उत्पन्न न होणे

उपाय:- तुपात केलेले उडीद पीठाचे लाडू खावेत. दुध व केशर रोज झोपण्यापूर्वी घ्यावे.

१५) संडासला कडा बनणे

उपाय:- १५ काळ्या मनुका रात्री पिण्याच्या पाण्यात भिजवाव्यात सकाळी उपाशीपोटी खाव्यात.

१६) लघवीला जळजळ होणे

उपाय:- १ ग्लास पाणी + १ चमचा धना पावडर + १ चमचा मध हे मिश्रण प्यावे.

१७) घामामुळे अंगाला दुर्गंध येणे

उपाय:- चंदन , कापूर पावडर अंगाला चोळावी.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

17 मिनिटे ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

21 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

21 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

21 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

23 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago