आरोग्य

ओव्हरइटिंग टाळण्यासाठी घरगुती उपाय

ओव्हरईटिंग म्हणजेच अति खाल्ल्यामुळे वजन तर वाढतेच पण त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अनेक वेळा आपण विचार न करता अति खातो. पण जेवण करण्यापूर्वी काही सवयी लावून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

उपाशी राहू नका

उपाशी राहिल्याने किंवा जेवण स्किप केल्याने तुम्हाला जास्त भूक लागते, ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका वाढतो. हेल्दी स्नॅक्स खाण्याची किंवा दर काही तासांनी थोडं थोडं खाण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची लेव्हल स्थिर राहील आणि तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाणार नाही.

तणावापासून लांब राहा

तणावाचा थेट परिणाम तुमच्या भूकेवर होतो. २०१४ च्या एका अभ्यासानुसार, तणावामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे भूक वाढते आणि जास्त खाण्याची सवय लागते. योग, मेडिटेशन आणि व्यायामाद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

नाश्ता करा

सकाळचा नाश्ता हा दिवसभरासाठी उर्जेचा स्त्रोत असतो. संशोधनात असं दिसून आलं आहे की, जे लोक सकाळी प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला नाश्ता करतात ते दिवसभर कमी खातात. नाश्ता वगळल्याने भूक वाढते, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता वाढते.

दर ४ तासांनी खा

भूक लागताच खाण्याची वेळ ठरवून घ्या. तुम्ही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमचं शरीर झटपट उर्जेसाठी अधिक खाण्याचा आग्रह धरेल. दर ४-५ तासांनी काहीतरी पौष्टिक खा, जेणेकरून तुमचे पोट भरलेलं राहील.

डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहा

टीव्ही पाहताना किंवा फोनवर स्क्रोल करताना खाल्लं तर ते तुमचे भुकेचे सिग्नल्स दाबतं. अशा परिस्थितीत तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाता. जेवताना, फक्त अन्नाकडे लक्ष द्या आणि ते काळजीपूर्वक चावून खा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

7 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

7 तास ago