CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 82?
सामान्यतः लोक कॅलरीजना लठ्ठपणासाठी जबाबदार मानतात. पण शरीरासाठी कॅलरीजचं योग्य प्रमाणात सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. कॅलरीज म्हणजे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर एका दिवसात नेमक्या किती कॅलरीज आवश्यक असतात.
प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. ही गरज वय, स्त्री-पुरुष, शारीरिक हालचाली आणि आरोग्यााच्या स्थितीवर अवलंबून असते. जास्त किंवा कमी कॅलरीजचं आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात.
शरीरासाठी किती कॅलरीज आवश्यक
१९ ते ५९ वयोगटातील व्यक्तीला दररोज १,६०० ते ३,००० किलोकॅलरीजची आवश्यकता असते. महिलांना दररोज सुमारे १,६०० ते २,४०० किलोकॅलरीजची आवश्यकता असते, तर पुरुषांना दररोज सुमारे २००० ते ३,००० किलोकॅलरीजची आवश्यकता असते. एकूण वापरल्या जाणाऱ्या कॅलरीजपैकी ४५% ते ६५% कार्बोहाइड्रेटमध्ये, २०% ते ३५% फॅटमधून आणि १०% ते ३५% प्रोटीनमधून यायला हवे.
पुरुषांसाठी
जर तुम्ही व्यस्त जीवनशैली जगत असाल आणि नियमित शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला दररोज २५०० कॅलरीजची आवश्यकता असते.
जर तुमची जीवनशैली नॉर्मल असेल तर २२०० कॅलरीजची आवश्यकता आहे.
आरामदायी जीवनशैलीसाठी तुम्हाला २००० कॅलरीजची आवश्यकता आहे.
महिलांसाठी
सक्रिय जीवनशैली असलेल्या महिलांना २००० कॅलरीजची आवश्यकता आहे.
नॉर्मल शारीरिक हालचाली करणाऱ्या महिलांसाठी १८०० कॅलरीजची आवश्यकता आहे.
जर एखाद्या महिलेची जीवनशैली खूपच कमी सक्रिय असेल तर १६०० कॅलरीज पुरेशा आहेत.
कॅलरीजचा वजनावर होणारा परिणाम
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमचं कॅलरीजचं प्रमाण कमी करावं लागेल. वजन कमी करण्यासाठी, शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळत राहावीत म्हणून निरोगी संतुलन राखून कॅलरीज कमी करणं उचित आहे.
जर तुमचं वजन खूप कमी असेल आणि तुम्हाला ते वाढवायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कॅलरीजचं प्रमाण वाढवावं लागेल. यासाठी उच्च कॅलरीज असलेला सकस आहार घेऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…