अन्न हे आरोग्यासाठी वरदान. साधारणपणे आपण दिवसातून ३ वेळा जेवतो. सकाळचा नाश्ता, ते रात्रीचं डिनर. दिवसातून ३ वेळा जेवताना ताटात आपल्या पौष्टीक पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. तर काही जण दिवसातून ५-६ वेळा जेवतात. तर काही लोक इंटरमिटंट फास्टिंगला प्राधान्य देतात.
जेवण्याचीही एक पद्धत असते. परंतु, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेमकं किती वेळा जेवावे? तज्ज्ञांच्या मते, अन्न पौष्टीक असण्यासोबतच ते योग्य वेळी घेणे महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त जीवनात अनेक जण आहाराची योग्य काळजी घेत नाही. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. जर हेल्दी जीवन जगायचं असेल तर, जेवण करण्याची पद्धत आणि दिवसभरात किती वेळा जेवावे? हे पाहा
वेट लॉससाठी मदत: आरोग्य तज्ज्ञ प्रियंका सोनी यांनी सांगितले की, दिवसभरात वेळोवेळी जेवण घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने आपली चयापचय बुस्ट होते. याशिवाय कॅलरीज बर्न करण्यासही मदत मिळते.
तीन वेळा अन्न खाणं टाळा: वजन कमी करायचे असेल तर दिवसातून तीन वेळा खाणे टाळा. त्याऐवजी, दिवसातून ५-६ वेळा छोटे मिल्स घ्या. यामुळे चयापचय बुस्ट होते. ज्याचा फायदा वेट लॉससाठी होतो.
मधुमेहग्रस्त रुग्णांनी किती वेळा जेवावे: मधुमेहग्रस्त रुग्णांनी दिवसभरात ५-६ वेळा कमी प्रमाणात कमी खावे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. त्यामुळे आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मुलुंड मेट्रो प्रकल्पाशी संबंधित २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू…
मुंबई: विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते.…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी भाजपवर जोरदार टीका केली. २०२३…
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने थेट रणशिंग फुंकले असून “संपर्क मंत्री अभियान” हे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन उच्च व…
मुंबई: भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “माझे नालंदा विद्यापीठ”…