आरोग्य

शुगर असेल तर दिवसातून कितीवेळा जेवण करण योग्य आहे

अन्न हे आरोग्यासाठी वरदान. साधारणपणे आपण दिवसातून ३ वेळा जेवतो. सकाळचा नाश्ता, ते रात्रीचं डिनर. दिवसातून ३ वेळा जेवताना ताटात आपल्या पौष्टीक पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. तर काही जण दिवसातून ५-६ वेळा जेवतात. तर काही लोक इंटरमिटंट फास्टिंगला प्राधान्य देतात.

जेवण्याचीही एक पद्धत असते. परंतु, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेमकं किती वेळा जेवावे? तज्ज्ञांच्या मते, अन्न पौष्टीक असण्यासोबतच ते योग्य वेळी घेणे महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त जीवनात अनेक जण आहाराची योग्य काळजी घेत नाही. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. जर हेल्दी जीवन जगायचं असेल तर, जेवण करण्याची पद्धत आणि दिवसभरात किती वेळा जेवावे? हे पाहा

वेट लॉससाठी मदत: आरोग्य तज्ज्ञ प्रियंका सोनी यांनी सांगितले की, दिवसभरात वेळोवेळी जेवण घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने आपली चयापचय बुस्ट होते. याशिवाय कॅलरीज बर्न करण्यासही मदत मिळते.

तीन वेळा अन्न खाणं टाळा: वजन कमी करायचे असेल तर दिवसातून तीन वेळा खाणे टाळा. त्याऐवजी, दिवसातून ५-६ वेळा छोटे मिल्स घ्या. यामुळे चयापचय बुस्ट होते. ज्याचा फायदा वेट लॉससाठी होतो.

मधुमेहग्रस्त रुग्णांनी किती वेळा जेवावे: मधुमेहग्रस्त रुग्णांनी दिवसभरात ५-६ वेळा कमी प्रमाणात कमी खावे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. त्यामुळे आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

5 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

5 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

6 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

21 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

21 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

21 तास ago