आरोग्य

मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन

वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खाणं अनेकांना आवडतं. बरेच लोक रोज जेवण झाल्यावर किंवा असेही न विसरता मिठाई खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मिठाईचा एक पीस तुमचं वजन वाढवू शकतं. साखर जी मिटाईतील मुख्य तत्व असते, त्यात कॅलरी भरपूर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल तर मिठाई आणि साखर खाणं सोडावं लागेल.

एक चमचा साखर(५ ग्रॅम)मध्ये जवळपास २० कॅलरीज असतात. ऐकायला जरी हे कमी वाटत असलं, तरी तुम्ही दिवसभर चहा, कॉफी, मिठाई आणि इतर फूड्सच्या माध्यमातूनही शुगर मिळवत असता. त्यामुळे कॅलरी वाढून तुमचं वजन वाढतं.

मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं वजन

गुलाब जामून (५० ग्रॅम) – जवळपास १५० ते २०० कॅलरीज.

रसगुल्ला (५० ग्रॅम) – १२५ ते १५० कॅलरीज.

बर्फी(४० ग्रॅम) – १५० ते १७० कॅलरीज.

लाडू (४० ग्रॅम) – १८० ते २०० कॅलरीज.

जर तुम्ही रोज मिठाईचं सेवन करत असाल आणि त्यासोबतच शुगर असलेल्या इतर पदार्थही खात असाल, तर तुमचं वजन वेगानं वाढू शकतं. दर ७, ७०० एक्स्ट्रा कॅलरीजमुळे तुमच्या वजनात १ किलो वाढ होऊ शकते.

साखर आणि मिठाई कमी खाण्यासाठी टिप्स

मिठाई कमी खा. मिठाई रोज खाण्याऐवजी एखादा इव्हेंट किंवा उत्सव असल्यावरच खा.

साखरेऐवजी मध, गूळाचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापर करा. याने कॅलरी वाढणार नाहीत.

जर तुम्ही मिठाई खाल्ली असेल तर कॅलरी बर्न करण्यासाठी एक्सरसाईज करा.

आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, ड्राय फ्रूट्स, ताजी फळं यांचा समावेश करा.

साखरेनं आरोग्याला धोका

जास्त साखर खाल्ल्यानं केवळ वजन वाढतं असं नाही तर डायबिटीस, हार्ट डिजीज आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

3 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

3 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

3 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

3 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

4 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

5 तास ago