वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खाणं अनेकांना आवडतं. बरेच लोक रोज जेवण झाल्यावर किंवा असेही न विसरता मिठाई खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मिठाईचा एक पीस तुमचं वजन वाढवू शकतं. साखर जी मिटाईतील मुख्य तत्व असते, त्यात कॅलरी भरपूर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल तर मिठाई आणि साखर खाणं सोडावं लागेल.
एक चमचा साखर(५ ग्रॅम)मध्ये जवळपास २० कॅलरीज असतात. ऐकायला जरी हे कमी वाटत असलं, तरी तुम्ही दिवसभर चहा, कॉफी, मिठाई आणि इतर फूड्सच्या माध्यमातूनही शुगर मिळवत असता. त्यामुळे कॅलरी वाढून तुमचं वजन वाढतं.
मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं वजन
गुलाब जामून (५० ग्रॅम) – जवळपास १५० ते २०० कॅलरीज.
रसगुल्ला (५० ग्रॅम) – १२५ ते १५० कॅलरीज.
बर्फी(४० ग्रॅम) – १५० ते १७० कॅलरीज.
लाडू (४० ग्रॅम) – १८० ते २०० कॅलरीज.
जर तुम्ही रोज मिठाईचं सेवन करत असाल आणि त्यासोबतच शुगर असलेल्या इतर पदार्थही खात असाल, तर तुमचं वजन वेगानं वाढू शकतं. दर ७, ७०० एक्स्ट्रा कॅलरीजमुळे तुमच्या वजनात १ किलो वाढ होऊ शकते.
साखर आणि मिठाई कमी खाण्यासाठी टिप्स
मिठाई कमी खा. मिठाई रोज खाण्याऐवजी एखादा इव्हेंट किंवा उत्सव असल्यावरच खा.
साखरेऐवजी मध, गूळाचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापर करा. याने कॅलरी वाढणार नाहीत.
जर तुम्ही मिठाई खाल्ली असेल तर कॅलरी बर्न करण्यासाठी एक्सरसाईज करा.
आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, ड्राय फ्रूट्स, ताजी फळं यांचा समावेश करा.
साखरेनं आरोग्याला धोका
जास्त साखर खाल्ल्यानं केवळ वजन वाढतं असं नाही तर डायबिटीस, हार्ट डिजीज आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
(सोशल मीडियावरून साभार)
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…
मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…