आरोग्य

कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतं असं तेल त्याचा वापर किती करावा…

तेल शरीरासाठी खूप महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. तेलाने शरीराल ऊर्जा मिळते, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अब्जॉर्ब करण्यासही मदत मिळते. शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा तेलाची मदत मिळते. तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही तेलाने मदत मिळते.

पण काही तेल हे आरोग्यासाठी नुकसान कारक असतात. या नुकसान कारक तेलाच्या वापराने लठ्ठपणा, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल वाढणं, पचनासंबंधी समस्या जसे की, अपचन, जुलाब इत्यादी समस्या होतात. हेच कारण आहे की, तुम्हाला माहीत असावं की, जेवण बनवण्यासाठी कोणतं तेल वापरावं आणि किती वापरावं.

भारतात खाद्यपदार्थांच्या गोष्टींच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी संस्था एफएसएसआयने सांगितलं आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कोणतं तेल वापरावं आणि किती वापरावं.

तेलांचा बदलून वापर करा

वेगवेगळे तेल वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी अ‍ॅसिड देतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या कामासाठी गरजेचे असतात. तेलाचे चांगले फायदे मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तेलांचा वापर केला पाहिजे. *उदाहरण* द्यायचं तर तुम्ही जर पोहे बनवत असाल तर तिळाच्या तेलाचा वापर केला पाहिजे, डाळीला तूपाचा तडका दिला पाहिजे. रात्री भाजी बनवण्यासाठी तुम्ही सनफ्लॉवर तेलाचा वापर केला पाहिजे.

जेवण बनवण्यासाठी चांगलं तेल कोणत

जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही भाजी बनवण्यासाठी सनफ्लॉवर, राईस ब्रान तेलांचा वापर करू शकता. जर तुम्ही रोज तेल बदलू शकत नसाल तर एफएसएसएआयने सल्ला की, तुम्ही तेल दर महिन्यात बदला. तेल वापरण्याच्या योग्य पद्धतीने हृदय आणि शरीर निरोगी राहतं. तसेच तेलाचा वापर कमी करावा.

या गोष्टींची घ्या काळजी

ऑलिव्ह आईल, सोयाबीन तेल, फल्ली तेल आणि सनफ्लॉवर तेल हे आरोग्यासाठी चांगले असतात. खोबऱ्याचं तेल आणि पाम ऑइलचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

20 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

20 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

20 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

20 तास ago

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…

20 तास ago

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…

20 तास ago