रात्री बराच वेळ झोप येत नाही? झोपेचे काही नियम आहेत, ज्याने गाढ झोप येईल, अलार्म शिवाय उठाल. झोपेत अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी वाढवू शकता. अलार्म लावून सकाळी उठणं हा जीवन जगण्याचा चांगला मार्ग नाही. अनेक जण सकाळी उठल्या नंतर कारण नसताना दुखी होतात, म्हणजेच रात्री अतिविचार केला असणार. यामुळे मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. जर असं होत असेल तर झोपण्या आधी काही गोष्टी करायला हव्यात, जेणेकरून चांगली झोप येईल.
1) मांस किंवा फॅट्सयुक्त जेवण खात असाल तर झोपण्याच्या २ ते ३ तास आधी खा. जेणेकरून त्याचे चांगले पचन होईल. झोपण्या आधी पाणी पिऊन नंतर झोपायला जा. ज्यामुळे फ्रेश वाटेल आणि झोप पूर्ण होईल.
2) झोपण्याच्या आधी अंघोळ करा. असे केल्याने शरीर निरोगी राहते. रात्री कोमट पाण्याने अंघोळ करा. अंघोळी नंतर १० ते २० मिनिट किंवा अर्ध्या तासाने झोपलात तरी चालेल. यामुळे चांगली झोप येईल. अंघोळ केल्याने त्वचेची स्वच्छता तर होतेच, शिवाय मनही चांगले राहते.
3) झोपण्याआधी जैविक तेलाचा दिवा लावा. ऑलिव्ह ऑईल, लिनसिड ऑईल अशा कोणत्याही प्रकारचा दिवा लावू शकता. ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी एक छोटा दिवा लावा. रात्री झोपताना अंथरूणात बसून योगाभ्यास किंवा ध्यान करा.
4) झोपताना डोकं उत्तर दिशेला ठेवू नका. ज्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्त हळूहळू डोक्याच्या दिशेला जाते. मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
5) तुम्ही नश्वर आहात हे लक्षात ठेवा. झोपण्याच्या आधी अंथरूणात बसून विचार करा. तुम्ही आज जे केलं ते सार्थक आहे का, तुम्ही काही चुकीचे तर नाही करत आहात ना. याचा विचार करा. मी २४ तासात जे केलं ते सार्थक आहे का. असा प्रश्न स्वत:ला विचारा.
6) अलार्मचा वापर करू नका. यामुळे दिवसाची आणि भविष्याची दिशा ठरत असते. तुम्ही ज्या पध्दतीचे जेवण करता त्या प्रमाणे झोपेची वेळ ठरवा.
7) उजव्या कुशीवर झोपा. ज्यामुळे चांगली झोप येईल. जेव्हा शरीर आराम करते तेव्हा मेटाबॉलिक स्थिती मंद होते.
8) सकाळी उठल्या नंतर हात एकमेकांवर घासून डोळ्यांना लावा. यामुळे शरीर लवकर जागते.
9) सकाळी उठताना आनंदाने उठा. प्राकृतिक कारणांमुळे अनेक जणांचा जीव जातो. जर तुम्हाला दुसरा दिवस पाहायला मिळाल तर तुम्ही जीवंत आहात याचा आनंद ठेवून चेहऱ्यावर हास्य ठेवा.
10) झोपेतून उठताना नेहमी उजव्या बाजूनेच उठा.
(सोशल मीडियावरून साभार)
श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.…
अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात मुंबई:…
अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची चाकूने…
१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा. २) भरपूर टाळ्या वाजवा. ३) हातापायाचे तळवे…
हेल्दी डाएट ठेवा हायपरटेंशन पासून वाचण्यासाठी आपण डाएटची काळजी घ्यावी. अरबट चरबट खाऊ नये. चुकीच्या…
विधानपरिषदेत गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पोलीस दलातील रिक्त पदे, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारला…