हिवाळ्यात सर्वांत मोठी समस्या त्वचाविकारांची! त्वचा कोरडी पडली की, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेचे आरोग्य सांभाळले पाहिजे. त्यासाठी योग्य उपाय करून त्वचेची काळजी घेतल्याने ती निरोगी राहायला मदत होते.
हिवाळ्यात त्वचेच्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात. साधाणरत: त्वचेचा कोरडेपणा, पापुद्रे निघणे, त्वचा निस्तेज होणे, काळपटपणा असे तक्रारींचे स्वरूप असते. उन्हाळ्यात आपली त्वचा नियमितपणे घामाला शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. म्हणूनच त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडत असतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात वाढत्या थंडीबरोबर त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढतात.
ही काळजी घ्या….
हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणावते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. हिवाळ्यातही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वचा कोरडी पडते.
हिवाळ्यात आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळाचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करावा. हिवाळ्यात शरीरात प्रोटिनची मात्रा कमी होते. ही मात्रा संतुलित राहण्यासाठी मासांहार करणे उपयुक्त ठरते. अंडी, कडधान्य, शेंगदाणे असे प्रोटिन देणारे पदार्थही हिवाळ्यात खाणं त्वचेसाठी फायदेशीर आहे.
संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे त्वचेचं आरोग्य नीट राहते. त्याचबरोबर हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणेही उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. जसे की, लिंबाचा रस आणि एरंड तेलाच्या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करणे आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुणे. रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी, ग्लिसरीन याचे मिश्रण लावल्यास हात-पाय मुलायम आणि चमकदार होतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…