आरोग्य

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल…

हिवाळ्यात सर्वांत मोठी समस्या त्वचाविकारांची! त्वचा कोरडी पडली की, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेचे आरोग्य सांभाळले पाहिजे. त्यासाठी योग्य उपाय करून त्वचेची काळजी घेतल्याने ती निरोगी राहायला मदत होते.

हिवाळ्यात त्वचेच्या बऱ्याच तक्रारी उद्‌भवतात. साधाणरत: त्वचेचा कोरडेपणा, पापुद्रे निघणे, त्वचा निस्तेज होणे, काळपटपणा असे तक्रारींचे स्वरूप असते. उन्हाळ्यात आपली त्वचा नियमितपणे घामाला शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. म्हणूनच त्वचेच्या तक्रारी उद्‌भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडत असतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात वाढत्या थंडीबरोबर त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढतात.

ही काळजी घ्या….

हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणावते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्‌भवते. हिवाळ्यातही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वचा कोरडी पडते.

हिवाळ्यात आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळाचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करावा. हिवाळ्यात शरीरात प्रोटिनची मात्रा कमी होते. ही मात्रा संतुलित राहण्यासाठी मासांहार करणे उपयुक्त ठरते. अंडी, कडधान्य, शेंगदाणे असे प्रोटिन देणारे पदार्थही हिवाळ्यात खाणं त्वचेसाठी फायदेशीर आहे.

संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे त्वचेचं आरोग्य नीट राहते. त्याचबरोबर हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणेही उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. जसे की, लिंबाचा रस आणि एरंड तेलाच्या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करणे आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुणे. रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी, ग्लिसरीन याचे मिश्रण लावल्यास हात-पाय मुलायम आणि चमकदार होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

3 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

8 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

8 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

8 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

8 तास ago