आरोग्य

७ तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात, अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती

रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आजारी पडण्याचे प्रमाण वाढतेय 

झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करते. त्यामुळे आपल्याला आजार होण्याची अधिक शक्यता असते. जसजसे आपण झोपेशिवाय राहतो तसससे आपण वास्तविक जगापासून लांब गेल्याची आणि संभ्रमात राहण्याची शक्यता वाढते.

नेमके काय होते

झोप हा आपल्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. झोप आपल्या शरीरातील अनेक यंत्रणांना आराम करण्यास आणि त्या नीट करण्यास, तसेच होणारे नुकसान टाळण्यासाठी सक्षम करते. झोप न घेतल्याने एकाग्रता कमी होण्याव्यतिरिक्त डोळे सुजणे, काळी वर्तुळे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ, लवकर निर्णय घेण्यास अक्षम होणे अशी लक्षणे दिसतात.

रात्रीची शिफ्ट नकोच

या लक्षणांवर मात करण्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस किंवा आठवडे लागू शकतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेकदा झोपेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. रात्रीच्या शिफ्टमधील कामगार दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांपेक्षा दररोज १ ते ४ तास कमी झोपतात. यामुळे त्यांच्या अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरीप आढावा बैठकीत ‘इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल’ची मांडणी

ठाणे: उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड…

3 तास ago

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन

ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट…

3 तास ago

मुंबईत ‘खड्डेमुक्ती’वर ९० कोटींचा प्रश्नचिन्ह; अनियमिततेच्या आरोपांवरून प्रशासनाला निवेदन

मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…

6 तास ago

पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…

6 तास ago

शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…

8 तास ago

पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…

8 तास ago