महाराष्ट्र

‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

२२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात केलेल्या या वक्तव्याचा अर्थ धार्मिक असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. भाजपसह काही संघटनांनी या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना समज देत नोटीस बजावली.

नोटिशीला उत्तर देताना सहर शेख यांनी आपला खुलासा दिला असून, “हिरवा” हा शब्द त्यांनी AIMIM पक्षाच्या झेंड्याच्या रंगाच्या संदर्भात आणि पर्यावरणपूरक विकास, वृक्षलागवड यासाठी वापरला असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप महाराष्ट्राचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सहर शेख यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषणे करताना जबाबदारीने बोलले पाहिजे. महाराष्ट्राची ओळख तिरंग्याशी आहे, कोणत्याही एका रंगाशी नाही.”

या संपूर्ण प्रकरणामुळे मुंब्रा परिसरात राजकीय वातावरण तापले असून, रंग, धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ होऊ नये, अशी मागणी विविध सामाजिक घटकांकडून केली जात आहे. लोकप्रतिनिधी हे कोणत्याही धर्माचे नसून ते सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे भाषणात संयम आणि संविधानिक मूल्यांचे भान राखावे, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.या प्रकरणावर पुढील कायदेशीर कारवाई होणार की प्रकरण शांत होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

9 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

11 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

11 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

11 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

11 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

11 तास ago