आरोग्य

१४ दिवसांसाठी साखर खाणं सोडलं तर पाहा शरीरात काय जादू होते

शुगर म्हणजेच साखरेचा वापर रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. आरोग्याची काळजी घेणारे लोक साखर कमी खातात तर जास्तीत जास्त लोक जास्त खातात. मग ती चहाच्या माध्यमातून असो वा गोड पदार्थांच्या माध्यमातून असो.

आपण नेहमीच ऐकतो की, साखर जास्त खाल्ल्यानं वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण तरीही लोकांना साखर खाण्याची सवय झालेली असते. इथे साखरेचा अर्थ केवळ साखर नाही तर वेगवेगळे गोड पदार्थ असा आहे.

जेवढी जास्त साखर खाल तेवढा टाइप २ डायबिटीस, लठ्ठपणा, हृदरोग, त्वचे विकारांचा धोका वाढतो. त्यामुळे साखर कमी खाल्ली पाहिजे.

जर तुम्ही काही दिवस साखर खाणं पूर्णपणे बंद केलं तर आरोग्याला इतके फायदे मिळतील ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अशात २ आठवडे म्हणजे १४ दिवस साखर खाणं बंद केलं तर काय होईल.

१४ दिवस साखर न खाण्याचे फायदे…

पोटावरील चरबी होईल कमी…

डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही जर केवळ १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केलं तर तुमच्या पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळेल. इतकंच नाही तर लिव्हरवर जमा झालेली चरबी देखील साखर खाणं बंद केल्यावर कमी होईल.

पोट चांगलं राहील…

तुम्ही जर १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केल तर तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. साखर खाणं सोडल्यानं हेल्दी बॅक्टेरिया रीस्टोर होतात, ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.

अॅक्ने होतील दूर…

जर साखरेला रोजच्या आहारातून बाहेर काढलं तर चेहऱ्यावरील अॅक्ने किंवा रेड स्पॉट कमी होतात. त्यामुळे चेहरा आणखी फ्रेश आणि चमकदार दिसतो.

चेहऱ्याचा शेपही होईल नॅचरल…

जर तुमच्या चेहऱ्यावर सर्कल दिसत असतील किंवा चेहऱ्यावर सूज आल्यासारखी वाटत असेल तर तुम्ही साखर खाणं लगेच बंद केलं पाहिजे. साखर खाणं बंद कराल तर चेहऱ्याचा शेप नॅचरल होईल.

एका दिवसात किती साखर खावी…

वयस्कांनी एका दिवसात ३० ग्रॅमपेक्षा अधिक फ्री शुगर खाऊ नये. त्याशिवाय ७ ते १० वर्षाच्या मुलांनी रोज २४ ग्रॅम आणि ४ ते ६ वर्षाच्या मुलांनी १९ ग्रॅमपेक्षा अधिक साखर खाऊ नये. एक चमचा साखरेमध्ये जवळपास २० कॅलरी असतात. जर तुम्ही जास्त साखर किंवा गोड खात असाल तर जास्त कॅलरी इनटेक करता. अशात तुमचं वजन वाढण्याची समस्या होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

6 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

6 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

6 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

6 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

6 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

6 तास ago