आरोग्य

दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत…

दूध हे पुर्णअन्न मानल जात. ते पौष्टिक तर आहेच त्यामुळे नियमितपणे आपल्या आहारात दूध असायला हव. पण दूध किंवा दुधाचे पदार्थ खाताना काही गोष्टींचं पथ्य पाळायला हवं. दुधासोबत कोणते पदार्थ खावे आणि काेणते पदार्थ टाळावे याचेही काही नियम आहेत. ते नियम एकतर आपल्याला माहितीच नाहीत किंवा मग माहिती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग भविष्यात आपल्याला त्वचेसंदर्भात काही आजार होण्याचा धोका असतो, असं डाॅक्टर सांगतात.

दुधासोबत खाऊ नयेत हे पदार्थ…

दूध आणि फळं एकत्र खाऊ नयेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फळांचे मिल्कशेक पिणं आरोग्यासाठी अयोग्य आहेत. पण त्यासोबतच डॉक्टरांनी असे काही दोन पदार्थ सांगितले आहेत जे अगदी सर्रासपणे बहुतांश घरांमध्ये दुधासोबत खाल्ले जातात. त्यातला पहिला पदार्थ आहे दूध आणि पोळी. दूध आणि गहू, दूध आणि मीठ हा विरुद्ध आहार मानला गेला आहे.

आपण जेव्हा पोळ्याा करतो तेव्हा कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ सुद्धा घालतो. दुधामध्ये पोळी कुस्करून खाण्याची सवय अनेकांना असते. काही घरांमध्ये तर लहान मुलांनाही दूध- पोळी खाऊ घातली जाते. म्हणजेच दुधासोबत आणि मीठ आणि गहू हे दोन्ही विरुद्ध पदार्थ आपण सर्रास खातो. यामुळे भविष्यात त्वचा रोग होऊ शकतो. तसेच दूध- भात खातानाही त्यात अनेकजण मीठ घालतात.

चहापोळी खाण्याची सवयही अनेकांना असते. या सवयी त्वचेसाठी अजिबातच चांगल्या नाहीत. आज असं खाल्लं तर उद्या लगेच तुम्हाला त्रास होईल असं नाही. या सगळ्या गोष्टी स्लो पॉईझनिंगप्रमाणे तुमच्या शरीरात काम करतात आणि कालांतराने त्याचे आरोग्यावर परिणाम दिसून येतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

6 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago