आरोग्य

खोकून खोकून छाती दुखते हे घरगुती उपाय करा

खोकल्याचा त्रास अनेकांना उद्भवतो. बरेचसे लोक खोकल्याच्या त्रासाने त्रस्त असतात. यासाठी लोक सुक्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असतात. जर तुम्हालाही खोकल्याची लक्षणं जाणवत असतील तर काही उपाय करू शकता. खोकल्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया. सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता.

खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी आलं फायदेशीर…

विनमॅक, इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार कफ, खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आल्याचं पाणी पिऊ शकता. आल्यात बायोएक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात. यातील बायोएक्टिव्ह कंम्पाऊंड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले की आल्यात एंटी इफ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आजारांचा धोका टाळता येतो. आल्यात एंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असल्यामुळे घशाचे त्रास उद्भवत नाही (Ref). मध आणि आल्याचं पाणी प्यायल्यास घश्याचा त्रास उद्भवत नाही. एक ग्लास पाणी उकळवायला ठेवून त्यात मध, लिंबू घालून नंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा.

1) खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात चुटकीभर मीठ घालून गुळण्या करा. असं केल्यानं घश्यातील त्रास, खोकल्यापासून आराम मिळेल.

२) आवळा खोकल्यासाठी उत्तम मानला जातो. आवळ्यात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. तुम्ही आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता. एंटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते.

३) अर्धा चमचा मधात एक चिमूट वेलची आणि लिंबाचा रस घाला. दिवसातून २ ते ३ वेळा या मिश्रणाचे सेवन करा. हा घरगुती उपाय केल्यास खोकल्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

४) डाळिंबाचा रससुद्धा खोकल्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी तुम्हाला डाळींबाच्या रसात आल्याचा रस घालावा लागेल.

५) लसूणसुद्धा खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. लसूण तुपात भाजून याचे सेवन करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

2 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

3 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

4 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

4 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

4 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

8 तास ago