आरोग्य

खोकून खोकून छाती दुखते हे घरगुती उपाय करा

खोकल्याचा त्रास अनेकांना उद्भवतो. बरेचसे लोक खोकल्याच्या त्रासाने त्रस्त असतात. यासाठी लोक सुक्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असतात. जर तुम्हालाही खोकल्याची लक्षणं जाणवत असतील तर काही उपाय करू शकता. खोकल्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया. सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता.

खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी आलं फायदेशीर…

विनमॅक, इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार कफ, खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आल्याचं पाणी पिऊ शकता. आल्यात बायोएक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात. यातील बायोएक्टिव्ह कंम्पाऊंड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले की आल्यात एंटी इफ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आजारांचा धोका टाळता येतो. आल्यात एंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असल्यामुळे घशाचे त्रास उद्भवत नाही (Ref). मध आणि आल्याचं पाणी प्यायल्यास घश्याचा त्रास उद्भवत नाही. एक ग्लास पाणी उकळवायला ठेवून त्यात मध, लिंबू घालून नंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा.

1) खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात चुटकीभर मीठ घालून गुळण्या करा. असं केल्यानं घश्यातील त्रास, खोकल्यापासून आराम मिळेल.

२) आवळा खोकल्यासाठी उत्तम मानला जातो. आवळ्यात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. तुम्ही आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता. एंटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते.

३) अर्धा चमचा मधात एक चिमूट वेलची आणि लिंबाचा रस घाला. दिवसातून २ ते ३ वेळा या मिश्रणाचे सेवन करा. हा घरगुती उपाय केल्यास खोकल्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

४) डाळिंबाचा रससुद्धा खोकल्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी तुम्हाला डाळींबाच्या रसात आल्याचा रस घालावा लागेल.

५) लसूणसुद्धा खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. लसूण तुपात भाजून याचे सेवन करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

17 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

18 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

18 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

18 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

23 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

23 तास ago