आरोग्य

कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाची चांगली स्वच्छता करणंही गरजेचं असतं. तोंडातील अनेक बॅक्टेरिया पोटात गेले तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. दात व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर दातांवर प्लाक जमा होतं आणि बॅक्टेरिया वाढतात. प्लाकमधील बॅक्टेरिया अ‍ॅसिड तयार करतं ज्यामुळे दातांचा वरचा थर खराब होऊ लागतो. दात निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दिवसातून दोनवेळा ब्रश करतात. पण कोणत्या स्थितीत ब्रश करू नये हे अनेकांना माहीत नसत.

डॉक्टर शादी मनोचेहरी यांनी दात कोणत्या स्थितीत दात ब्रश करू नये याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्यानुसार तीन स्थिती अशा असतात जेव्हा तुम्ही ब्रश करणं टाळलं पाहिजे. जेणेकरून दातांचं अधिक नुकसान होणार नाही. दात चांगले ठेवण्यासाठी हे करणं आवश्यक असतं.

उलटी केल्यावर: उलटी केल्यावर तोंडाची चव पूर्ण बदलते. तोंडाचा वासही येऊ लागतो. अशात बरेच लोक ब्रश करतात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण उलटी अ‍ॅसिडिक असते त्यामुळे तोंडही अ‍ॅसिडिक होतं. उलटीमधील अ‍ॅसिड दातांवर चिकटून राहतं. अशात जर तुम्ही ब्रश करत असाल तर हे अ‍ॅसिड दातांवर आणखी घासलं जातं. याने दातांच्या वरच्या थराचं नुकसान होतं. दात कमजोर होतात. उलटी केल्यावर केवळ पाण्याने गुरळा करावा.

कॉफी प्यायल्यावर: कॉफी प्यायल्यानंतर लगेच ब्रश करू नये. कॉफी सुद्धा अ‍ॅसिडिक असते. दूध आणि साखर असलेली कॉफी अधिक अ‍ॅसिडिक असते. त्यामुळे कॉफी प्यायल्यावर ब्रश केल्याने दातांचा वरचा थर खराब होतो. दात लवकर कमजोर होतात.

नाश्ता केल्यानंतर: नाश्ता करण्याआधी ब्रश केलं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडात बॅक्टेरिया असतात. अशात जर ब्रश न करता नाश्ता केला तर बॅक्टेरिया पोटात जाता. तेच जर नाश्ता केल्यावर लगेच ब्रश केलं दाताचा वरचा थर खराब होतो. जास्त टूथपेस्टही दातांना खराब करू शकतं. त्यामुळे ब्रश करण्यासाठी किती टूथपेस्ट वापरावी हेही महत्वाचं असतं.

किती वापरावं टूथपेस्ट: सत्य हे आहे की, दात योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी केवळ मटरच्या आकाराएवढं टूथपेस्ट वापरणं पुरेसं आहे. ६ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांबाबत सांगायचं तर टूथपेस्टचं प्रमाण हे तांदळाच्या दाण्याएवढं असायला हवं.

एवढंच योग्य प्रमाण: दात स्वच्छ करण्यासाठी आणि चमकवण्यासाठी तुम्हाला केवळ मटरच्या दाण्याएवढंच टूथपेस्ट वापरायचं आहे. कार टूथपेस्टचा मुख्य उद्देश दातांना फ्लोराइड आणि काही प्रमाणात चमक देणे हा आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

3 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

3 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

3 तास ago

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…

3 तास ago

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

5 तास ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

6 तास ago