आरोग्य

कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाची चांगली स्वच्छता करणंही गरजेचं असतं. तोंडातील अनेक बॅक्टेरिया पोटात गेले तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. दात व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर दातांवर प्लाक जमा होतं आणि बॅक्टेरिया वाढतात. प्लाकमधील बॅक्टेरिया अ‍ॅसिड तयार करतं ज्यामुळे दातांचा वरचा थर खराब होऊ लागतो. दात निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दिवसातून दोनवेळा ब्रश करतात. पण कोणत्या स्थितीत ब्रश करू नये हे अनेकांना माहीत नसत.

डॉक्टर शादी मनोचेहरी यांनी दात कोणत्या स्थितीत दात ब्रश करू नये याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्यानुसार तीन स्थिती अशा असतात जेव्हा तुम्ही ब्रश करणं टाळलं पाहिजे. जेणेकरून दातांचं अधिक नुकसान होणार नाही. दात चांगले ठेवण्यासाठी हे करणं आवश्यक असतं.

उलटी केल्यावर: उलटी केल्यावर तोंडाची चव पूर्ण बदलते. तोंडाचा वासही येऊ लागतो. अशात बरेच लोक ब्रश करतात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण उलटी अ‍ॅसिडिक असते त्यामुळे तोंडही अ‍ॅसिडिक होतं. उलटीमधील अ‍ॅसिड दातांवर चिकटून राहतं. अशात जर तुम्ही ब्रश करत असाल तर हे अ‍ॅसिड दातांवर आणखी घासलं जातं. याने दातांच्या वरच्या थराचं नुकसान होतं. दात कमजोर होतात. उलटी केल्यावर केवळ पाण्याने गुरळा करावा.

कॉफी प्यायल्यावर: कॉफी प्यायल्यानंतर लगेच ब्रश करू नये. कॉफी सुद्धा अ‍ॅसिडिक असते. दूध आणि साखर असलेली कॉफी अधिक अ‍ॅसिडिक असते. त्यामुळे कॉफी प्यायल्यावर ब्रश केल्याने दातांचा वरचा थर खराब होतो. दात लवकर कमजोर होतात.

नाश्ता केल्यानंतर: नाश्ता करण्याआधी ब्रश केलं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडात बॅक्टेरिया असतात. अशात जर ब्रश न करता नाश्ता केला तर बॅक्टेरिया पोटात जाता. तेच जर नाश्ता केल्यावर लगेच ब्रश केलं दाताचा वरचा थर खराब होतो. जास्त टूथपेस्टही दातांना खराब करू शकतं. त्यामुळे ब्रश करण्यासाठी किती टूथपेस्ट वापरावी हेही महत्वाचं असतं.

किती वापरावं टूथपेस्ट: सत्य हे आहे की, दात योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी केवळ मटरच्या आकाराएवढं टूथपेस्ट वापरणं पुरेसं आहे. ६ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांबाबत सांगायचं तर टूथपेस्टचं प्रमाण हे तांदळाच्या दाण्याएवढं असायला हवं.

एवढंच योग्य प्रमाण: दात स्वच्छ करण्यासाठी आणि चमकवण्यासाठी तुम्हाला केवळ मटरच्या दाण्याएवढंच टूथपेस्ट वापरायचं आहे. कार टूथपेस्टचा मुख्य उद्देश दातांना फ्लोराइड आणि काही प्रमाणात चमक देणे हा आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

8 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

8 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

8 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

9 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago