आरोग्य

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते.

ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.

किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा रक्तातील खनिजे आणि पोषक तत्वांचे संतुलन बिघडते.

किडनी फेल झाल्याची लक्षणे लघवीमध्ये दिसून येतात. अशा वेळी वारंवार लघवीला होणे, लघवीतून रक्त येणे, लघवी करताना अधिक फेस येणे. यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

आपल्या डोळ्यांचा खालचा भाग सुजलेला वाटत असेल तर किडनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

टाचांमध्ये किंवा तळपायांमधून पाणी निघणे हे किडनीचे काम व्यवस्थित होत नाही आहे याचे लक्षण आहे. तसेच हृदयरोग आणि मज्जातंतूंच्या समस्यांशी देखील सामना करावा लागतो.

इलेक्ट्रोलाइट असंतुलन हे किडनीच्या खराब कार्यामुळे होते. यामध्ये कॅल्शियमची पातळी कमी होऊन स्नायू दुखतात.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

5 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

12 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

12 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

12 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

13 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

13 तास ago