आरोग्य

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते.

ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.

किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा रक्तातील खनिजे आणि पोषक तत्वांचे संतुलन बिघडते.

किडनी फेल झाल्याची लक्षणे लघवीमध्ये दिसून येतात. अशा वेळी वारंवार लघवीला होणे, लघवीतून रक्त येणे, लघवी करताना अधिक फेस येणे. यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

आपल्या डोळ्यांचा खालचा भाग सुजलेला वाटत असेल तर किडनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

टाचांमध्ये किंवा तळपायांमधून पाणी निघणे हे किडनीचे काम व्यवस्थित होत नाही आहे याचे लक्षण आहे. तसेच हृदयरोग आणि मज्जातंतूंच्या समस्यांशी देखील सामना करावा लागतो.

इलेक्ट्रोलाइट असंतुलन हे किडनीच्या खराब कार्यामुळे होते. यामध्ये कॅल्शियमची पातळी कमी होऊन स्नायू दुखतात.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

1 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

1 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

1 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

1 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

1 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

2 तास ago