आरोग्य

वांग खाण्याचे औषधी गुणधर्म

१) वांग्याचे भरीत: वांग हे चांगलं धुऊन घ्यावे. चुलीवर किंवा गॅस वर चांगले भाजावे. वरची जळलेली साल काढून टाकावी. मग त्या मग ज्यामध्ये मिरपूड, हिंग, सैंधव टाकून चांगले घोटावे व ज्वारीच्या भाकरीबरोबर खावे, भरिता मध्ये तेल कधीही टाकू नये, टाकले तर पचायला खूपच जड होते. अन्नाचे त्यांनी चांगले पचन होते, भूकही छान लागते. भरतासाठी डोरलं वांग भेटल्यास एकदम उत्तम. माझ्याकडे येणाऱ्या दोन प्रकारच्या रुग्णांना मी भरीत खायला सांगतो. ज्यांना झोप लागत नाही ,त्यांनीही रात्री खावे, तसेच बऱ्याच जणांची सारखे पोट दुखत असते, पोट फुगले की मग हृदयावर दाब पडतो. मग कसतरी होतय, अस्वस्थ होत, अशी लक्षणे जाणवतात, त्यांना हा भरताचा प्रयोग छान लागू करतो ,मात्र यासाठी डोरलं वांग, जास दश मुळात ‘बहती’ असे म्हणतात ते भेटल्यास चांगल, “भाव प्रकाश’ नावाच्या ग्रंथात याचे खूप छान वर्णन केलेले आहेत, ग्रंथात सर्व गोष्टी सांगितलेले असतात, त्यासाठी ग्रंथाचे सतत वाचन गरजेचे असते.

2) ताप खोकला: तापामध्ये, ही भाजी जरूर खावी. काहीजण वांग्याच्या बिया काढूनही भाजी करतात, तापात तोंडी लावण्यासाठी ही भाजी उत्तम आहे. तोंडास चांगली रुची येते, शरीरातील क फ कमी होऊन, आम कमी होतो तापात ताजी वांगी वाफवून करावेत त्यात चवीसाठी सैंधव व आले टाकावं खूप छान भाजी होते. घरातील कुणी आजारी असल्यास, जरूर करून बघा. लाल तिखट हे टाकू नये. वाफवून भाजी केल्यास छान लागते. तांदूळ भाजून केलेला मऊ भात व वांग्याची भाजी, ताप खोकल्या मध्ये उत्तम आराम देणारी योजना आहे.

3) मुळव्याध: मूळव्याधीच्या लोकांना पांढरे वांगे खाण्याचा सल्ला देला जातो. व काहींना वांगी भाजून ते फडक्यात बांधून त्याने ही जागा शेकायला सांगीतली जाते. मात्र ते काळजीपूर्वक करावे.

4) झोप येण्यासाठी: झोप येण्यासाठी, वांगे खूपच फायदेशीर ठरते. वांग्यांच्या पानांचा रस दोन चमचे, खडीसाखरेसह घेतल्यास उत्तम झोप लागते .तसेच वांग्याचा वर सांगितल्याप्रमाणे भरीत खायला सांगतो, त्याने छान आराम पडतो.

5) वजनदार व्यक्तींसाठी: काही लोकांच् शरीर हे फुगते, त्यांच्यामध्ये मेद खूपच वाढलेला असतो, त्यांनी अजून मधून वांग्याची भाजी जरूर खावी. अशक्त माणसांनीही भाजी खाल्ली, तर थोड्या दिवसात शक्ती आल्या सारखे वाटेल, गाठीवरती वांगे भाजून लावण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. अशक्तपणा वरती, वांग्याची भाजी ही खूपच चांगली आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

31 मिनिटे ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

35 मिनिटे ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

37 मिनिटे ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

48 मिनिटे ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

3 तास ago