आरोग्य

बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी घातक! मिनरल वॉटरच्या नावावर २० रुपयांना विकलं जातं ‘विष’

तहान लागल्यावर घराबाहेर असताना साधारणपणे बहुतेक लोक बाहेर त्यांच्या आरोग्याचा विचार करुन बाटलीबंद पाणी घेतात. ज्यावर ‘मिनरल वाॅटर’ असे लिहिलेले असेल. सामान्यतः चांगल्या दर्जाची असल्याचा दावा करणाऱ्या कंपनीची सीलबंद पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते.पण हे बाटलीबंद पाणी तुमच्या आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही याची तुम्हाला जाणीवही नसेल. बाटलीबंद पेय आणि मिनरल वाॅटर आरोग्यासाठी घातक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने अशा मिनरल वाॅटरला ‘हाय रिक्स’ श्रेणीत ठेवले आहे.

ट्रेन, बस किंवा फक्त प्रवास करताना तुम्ही जे मिनरल वॉटर पाणी पिता ते तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकतं. केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस अथॉरिटीने (एफएसएसए) सोमवारी बाटलीबंद केलेले पेय आणि मिनरल वॉटरला हाय रिस्क खाद्यपदार्थांच्या श्रेणीमध्ये टाकलं. त्यामुळे आता बाटलीबंद पाण्याची अनिवार्य तपासणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनिवार्य अट काढून टाकल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बाटलीबंद केलेले पेय आणि हाय रिस्क श्रेणीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, याचा अर्थ आता या उत्पादनांच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि त्यांची तपासणी केली जाईल आणि थर्ड पार्टी आॅडिट केले जाईल. एफएसएसएसए आयचा हा निर्णय म्हणजे बाटलीबंद पाणी किती सुरक्षित आहे याचा पुरावा देत आहे. दुसरीकडे, पॅकेज्ड ड्रिंककिंग वाॅटर व्यावसायिकांनी यापूर्वी सरकारकारकडे नियम सुलभ करण्याची मागणी केली होती.बीआयएस आणि एफएसएस आय या दोघांना दुहेरी प्रमाणीकरणाची आवश्यकता काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती. तज्ज्ञांचे मत आहे की नवीन नियम प्रकिया सुव्यवस्थित करण्यास आणि उत्पादकांवरील भार कमी करण्यास मदत करु शकतात.

बाटल्यांमध्ये पॅक केलेल्या पाण्यात प्लास्टिकमधील रसायने मिसळू शकतात, जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. बीपीए (बिस्फेनाॅल एक) सारख्या बाटल्यांमध्ये असलेली रसायने, त्याच बाटलीमध्ये पाणी जास्त काळ ठेवल्यास फॅथलेट्स पाण्यात विरघळू शकतात. रसायनांचे सेवन केल्यावर कर्करोग आणि इतर गंभीर इतर गंभीर आजार होऊ शकतात. नैसर्गिक स्त्रोतांमधून येणाऱ्या पाण्यामध्ये सामान्यतः कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी आवश्यक खनिजे असतात. जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.परंतु बाटलीबंद पाण्यांत या खनिजांची कमतरता असू शकते. कारण पाणी शुध्द करण्याच्या प्रक्रियेत ही पोषकतत्वे नष्ट होतात.

बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. हे छोटे प्लास्टिकचे कण शरीरात प्रवेश करु शकतात आणि पोट, आतडे आणि इतर अवयवांमध्ये जमा होऊ शकतात. त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या, कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

11 मिनिटे ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

13 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

19 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

19 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

20 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

20 तास ago