आरोग्य

दह्यात ‘या’ चारपैकी कोणतीही १ गोष्ट कालवून खा, वजन होईल कमी अन् हाडंही होतील मजबूत

भरपूर लोक रोज आवडीनं दही खातात. दही खायला तर टेस्टी लागतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच दह्यात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन, मिनरल्स भरपूर असतात. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर योग्य पद्धतीनं दही खाल तर त्याचे जास्त फायदे मिलू शकतात.

दह्याचे फायदे

डॉक्टर रेखा यांनी सांगितलं की, जर योग्य व्यक्तीनं योग्य वेळी दही खाल्लं तर यापासून अनेक फायदे मिळू शकतात. ज्यामुळे वात संतुलित होतो, शुक्राणुंची गुणवत्ता सुधारते आणि हाडं मजबूत होतात. हे दह्याचे मुख्य फायदे आहेत.

दही लवकर कसं पचवाल

दह्यात सैंधव मीठ, काळी मिरी, मद आणि तूप टाकून खायला हवं. या चारपैकी कोणतीही एक गोष्ट दह्यात टाकल्यानं दही लवकर पचतं. काळी मिरीनं आणि सैंधव मिटामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत मिलते.

कुणी खावं दही

नियमितपणे एक्सरसाईज करणारे किंवा चांगली भूक असलेल्या लोकांसाठी दही फायदेशीर असतं. ज्या लोकांना गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, स्किन डिजीज आहेत आणि जे लठ्ठपणा, जास्त वजनानं हैराण आहेत ते सुद्धा दही खाऊ शकतात.

कोणत्या वेळी खावं दही

जास्तीत जास्त लोकांना दही खाण्याची योग्य वेळच माहीत नसते. ज्यामुळे सर्दी, खोकला, गॅस, पोटदुखी अशा समस्या होतात. आयुर्वेद डॉक्टरांनुसार, दही केवळ दुपारी खावं. यावेळे शिवाय कोणत्याही वेळी दही खाऊ नये.

वजन कमी करण्यासाठी काय

जर तुमचं वजन वाढलेलं असेल, लठ्ठपणा असेल किंवा अन्न व्यवस्थित पचन होत नसेल तर दही खाऊ नका. दह्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता. यातही भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक असतात. सोबतच कॅल्शिअम, प्रोटीनही असतं. ज्यामुळे पचन चांगलं होतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

1 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

3 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

3 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

4 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

4 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

8 तास ago