हल्ली मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असं काहीही न बघणारे लहान मूल क्वचितच एखादं सापडेल. बहुतांश मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या स्क्रीनचं अक्षरश: वेड लागलं आहे. उठल्या उठल्या आधी मोबाईल बघणारे आणि दिवसभर कामानिमित्त लॅपटॉपच्या स्क्रिनला चिटकून बसणारे, त्यानंतरही घरी आल्यावर टीव्ही पाहून रिलॅक्स होणारे पालक घरात असल्यावर मुलं वेगळं तरी काय करणार. पण लहान मुलांचे डोळे नाजूक असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात स्क्रिन पाहिल्याने त्यांच्यामध्ये मायोपिया हा दृष्टीदोष वाढत आहे.
मायोपिया म्हणजे नेमकं काय
मायोपिया हा दृष्टीशी संबंधित एक आजार असून यामध्ये मुलांना दुरचं दिसायला त्रास होतो. आधीच स्क्रीन बघण्याचं वाढलेलं प्रमाण, मैदानी खेळ न खेळणं आणि त्यात योग्य आहाराची कमतरता. यामुळे हा आजार मुलांमध्ये खूपच वाढला आहे, असं या अभ्यासात सांगण्यात आलं असून २०५० पर्यंत तर हा आजार खूपच वाढणार असल्याचं नेत्रतज्ज्ञ सांगतात. पुस्तकं वाचताना किंवा लिखाण करताना काही मुलं पुस्तक डोळ्याच्या खूपच जवळ धरतात. यामुळेही डोळ्यांना हा त्रास होऊ शकतो.
मुलांना मायोपियाचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी
१) मुलांना काही त्रास होवो अथवा न होवो, पण दर ६ महिन्यांनी मुलांची डोळे तपासणी करायलाच पाहिजे.
२) मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी किंवा घराबाहेर पडून काहीतरी खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करा.
3) मुलांचा स्क्रिनटाईम खूप मर्यादित करा. कारण हल्ली मुलांना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यापासून दूर ठेवताच येत नाही. पण त्यांचं गॅझेट्स बघण्याचं प्रमाण मात्र मर्यादित ठेवा.
४) डोकेदुखी, टीव्ही बघताना डोळे बारीक करून टीव्ही- मोबाईल बघणं किंवा डोळ्यांतून सतत पाणी येणं अशी लक्षणं मुलांमधे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
५) मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषक ठरणारे पदार्थ मुलांना जास्त प्रमाणात खायला द्या.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…